शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: अहिंसा यात्रेने देशाला एका विचाराने जोडले, PM मोदींचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 06:43 IST

पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार : सप्तवर्षीय यात्रेचा समारोप, २० राज्यात केला अहिंसेचा प्रचार

नवी दिल्ली : भारताला हजारो वर्षांपासून संत, ऋषी, मुनी व आचार्य यांची महान परंपरा आहे. आचार्यश्री महाश्रमणजी यांनी सात वर्षांत १८००० किमीची पदयात्रा पूर्ण केली आहे. ही पदयात्रा जगातील तीन देशांची होती. या माध्यमातून आचार्यश्री यांनी वसुधैव कुटुम्बकम या भारतीय विचाराचा विस्तार केला आहे, देशाला एका विचाराने जोडले आहे, असे मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. शांतिदूत युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या सप्तवर्षीय अहिंसा यात्रेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी लालकिल्ला येथून प्रारंभ झालेल्या या अहिंसा यात्रेचा रविवारी (दि.२७)  तालकटोरा स्टेडियम येथे समारोप झाला. यावेळी ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्वेतांबर तेरापंथच्या आचार्यांचे मला नेहमीच प्रेम मिळत आलेले आहे. आचार्य तुलसीजी, त्यांचे पट्टधर आचार्य महाप्रज्ञजी आणि आता आचार्यश्री महाश्रमणजी यांचे आशीर्वाद मिळत आलेले आहेत. त्यामुळेच मला असे वाटते की, यह तेरापंथ है, यह मेरा पंथ है. रविवारी सकाळी ८.५० वाजता या समारोप समारंभासाठी आचार्यश्री यांनी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेतून प्रस्थान केले. ते जसजसे तालकटोरा स्टेडियमकडे जात होते तशी भाविकांची गर्दी वाढत होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हेही यात्रेत सहभागी झाले. यावेळी व्यासपीठावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, नेपाळचे माजी उपराष्ट्रपती परमानंद झा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या दर्शनाचा दुसऱ्यांदा लाभ मिळाला हे माझे भाग्य आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थित होते. ते म्हणाले की, देशहितासाठी एका धर्माचार्यांकडून हजारो किमीची यात्रा हे एकमेव उदाहरण आहे. यावेळी खासदार एस. एस. अहलुवालिया, माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया व भारतातील नेपाळचे राजदूत रामप्रसाद सुबेदी यांनी विचार मांडले. यावेळी देशविदेशांतील दिग्गज या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. यात प्रामुख्याने नेपाळचे माजी राष्ट्रपती रामबरण यादव, सरसंघचालक मोहन भागवत, आसाम व नागालँडचे राज्यपाल जगदीश मुखी, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस, ओडिशाचे राज्यपाल गणेशीलाल, तेलंगणाचे व पद्दुचेरीचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदरराजन, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आपले विचार मांडले. 

सद्भावना, नैतिकता आणि नशामुक्ती या उद्देशाने जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे अकरावे आचार्यश्री महाश्रमण यांनी अहिंसा यात्रेच्या माध्यमातून भारतातील २० राज्यांत आपले उपदेश, प्रवचने यातून अहिंसेचा प्रचार केला. 

१८,००० किमी यात्रेत पायी चालून आचार्यश्री यांनी नेपाळ, भूतानमध्येही मंगल संदेशातून लोकांना सन्मार्ग दाखविला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान