शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

"रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती’’, शशी थरूर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:55 IST

Russia-Ukraine War: शशी थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असं विधान केलं आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, २०२२ साली जेव्हा या युद्धाला तोंड फुटलं होतं तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सडकून टीका केली होती. मात्र आता शशी थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असं विधान केलं आहे. तसेच आपण तेव्हा घेतलेल्या भूमिकेबाबत खेद वाटत आहे, असंही थरूर यांनी म्हटलं आहे.

त्याचं झालं असं की, २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाला तोंड फुटल्यानंतर शशी थरून यांनी तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. तेव्हा शशी थरूर संसदेमध्ये म्हणाले होते की, रशिया आपला मित्र आहे आणि त्यांचे सुरक्षेबाबतचे काही प्रश्न असतील. मात्र रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारतानं अचानक मौन बाळगणं युक्रेन आणि त्यांच्या समर्थकांसाठी निराशाजनक असेल. भारताने या मुद्द्यावर मौन बाळगणं हे दुर्दैवी आहे. 

दरम्यान, आता तीन वर्षांनंतर शशी थरूर यांनी तेव्हाच्या परिस्थितीबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे आणि भारत सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती हे कबूल केले आहे. ते म्हणाले की, आता तीन वर्षांनंतर मला माझ्या त्यावेळच्या  भूमिकेबाबत खूप खेद वाटत आहे. मी तेव्हा जी भूमिका घेतली होती ती योग्य नव्हती. फेब्रुवारी २०२२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेवेळी भारत सरकारच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकमेव व्यक्ती होतो. रशियाने युक्रेनवर केलेलं आक्रमण हे संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन असल्याचं मी म्हटलं होतं. सीमांची अखंडता आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या तत्त्वाचं इथे उल्लंघन झालं असल्याचं मी म्हटलं होतं.  आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी बलप्रयोगाचा वापर आपण कायम अस्वीकारार्ह मानत आलो आहोत. या युद्धामध्ये या सर्व तत्त्वांचं उल्लंघन झालं असून, आणप त्याचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी मी तेव्हा केली होती.

मात्र तीन वर्षांनंतर आता असं वाटतं की मीच चुकीचा होतो. आज भारताकडे वास्तवात असा पंतप्रधान आहे जो दोन आठवड्यांच्या फरकाने युक्रेनच्या राष्ट्रपतींची आणि रशियाच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेऊ शकतो. या धोरणामुळे भारत कायमस्वरूपी शांततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. आपण युरोपमध्ये नाही ही सत्य परिस्थिती आहे. आपण युरोपमध्ये नाही आहोत. तसेच आपल्याला थेटपणे कसलाही धोका नाही आहे. खरंतर तेथील सीमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला काही फायदा होत नाही, असेही थरूर म्हणाले.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीयShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत