शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भारत-बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची भेट, भेटीपेक्षा त्यांच्यामागील फोटोचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 20:02 IST

दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली. 

भारत आणि बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी भेट घेतली. बांगलादेशचे लष्करप्रमुख शफीउद्दीन अहमद तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची दिल्लीत भेट घेतली. दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली. 

मनोज पांडे आणि एसएम शफीउद्दीन अहमत यांनी ज्या ठिकाणी भेट घेतली त्यांच्या मागे भिंतीवर एक फोचो लावण्यात आलेला आहे. हा फोटो १९७१ मध्ये ढाका मध्ये भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी लष्करानं बिनशर्त सरंडर केलं होतं होतं त्याचा आहे. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका येथील रेस कोर्स मैदानात संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल एएके नियाजी यांनी सरंडर करण्याच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली. त्यांच्या शेजारी भारतीय लष्कराचे तत्कालिन लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा आहेत. त्यावेळी पाकिस्तानच्या तब्बल ९३ हजार सैनिकांनी सरंडर केलं होतं. यानंतर पूर्व पाकिस्तान एक स्वतंत्र देश बांगलादेश बनला.

पाकिस्तानी सैन्यानं सरंडर केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीतील लोकसभेत ढाका ही आता स्वतंत्र बांगलादेशची राजधानी असल्याची घोषणा केली. यासह जगाच्या नकाशावर नवीन देशही आला. विशेष म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांनी ढाका येथील रेसकोर्स मैदानावर जिकडे जनरल नियाझींनी शरणागती पत्करली त्याच मैदानातून एकेकाळी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. यालाच पुढे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूप मिळाले.

भारतीय लष्कराचा विजयहे भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाचे चित्र आहे. यानंतर एक नवा स्वतंत्र देश निर्माण झाला. या युद्धात भारताचे ३००० सैनिक शहीद झाले, तर १२००० हून अधिक सैनिक जखमी झाले. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान