शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची भेट, भेटीपेक्षा त्यांच्यामागील फोटोचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 20:02 IST

दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली. 

भारत आणि बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी भेट घेतली. बांगलादेशचे लष्करप्रमुख शफीउद्दीन अहमद तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची दिल्लीत भेट घेतली. दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली. 

मनोज पांडे आणि एसएम शफीउद्दीन अहमत यांनी ज्या ठिकाणी भेट घेतली त्यांच्या मागे भिंतीवर एक फोचो लावण्यात आलेला आहे. हा फोटो १९७१ मध्ये ढाका मध्ये भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी लष्करानं बिनशर्त सरंडर केलं होतं होतं त्याचा आहे. १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका येथील रेस कोर्स मैदानात संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल एएके नियाजी यांनी सरंडर करण्याच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली. त्यांच्या शेजारी भारतीय लष्कराचे तत्कालिन लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा आहेत. त्यावेळी पाकिस्तानच्या तब्बल ९३ हजार सैनिकांनी सरंडर केलं होतं. यानंतर पूर्व पाकिस्तान एक स्वतंत्र देश बांगलादेश बनला.

पाकिस्तानी सैन्यानं सरंडर केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीतील लोकसभेत ढाका ही आता स्वतंत्र बांगलादेशची राजधानी असल्याची घोषणा केली. यासह जगाच्या नकाशावर नवीन देशही आला. विशेष म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांनी ढाका येथील रेसकोर्स मैदानावर जिकडे जनरल नियाझींनी शरणागती पत्करली त्याच मैदानातून एकेकाळी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. यालाच पुढे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचे रूप मिळाले.

भारतीय लष्कराचा विजयहे भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाचे चित्र आहे. यानंतर एक नवा स्वतंत्र देश निर्माण झाला. या युद्धात भारताचे ३००० सैनिक शहीद झाले, तर १२००० हून अधिक सैनिक जखमी झाले. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान