शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:21 IST

भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.

सिंगापूर : पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारतीय विमानांची हानी झाल्याचे भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अप्रत्यक्ष मान्य केले. परंतु भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. विमाने का पाडली गेली याची कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

चौहान हे सिंगापूरमध्ये शांग्रीला संवाद परिषदेत सहभागी होण्यासाठी  गेले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझ्या मते, विमान पाडण्यात आले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या कारणांमुळे ते पाडले हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही आखलेल्या डावपेचांतील चुका आमच्या लक्षात आल्या. त्या आम्ही सुधारल्या आणि पुन्हा दोन दिवसांनी अमलात आणल्या. आम्ही पुन्हा हवाई हल्ले करून ठरविलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. 

पाकिस्तानचा दावा काय?

७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली, ज्यामध्ये ५ भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. पाच विमानांमध्ये ३ राफेल होते. नंतर, पाकने ६ भारतीय विमाने पाडल्याचा दावा करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले एअर मार्शल भारती?

भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन्स विभागाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मे रोजी पत्रकारांना सांगितले होते की, लढाईमध्ये हानी होतच असते. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले भारतीय हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षित परत आले.

पाक चेकपोस्टवर तालिबानचा हल्ला

काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान-सिंध प्रांतात स्वातंत्र्य लढा पेटत असताना अफगाणिस्तानशीही आता सीमावाद पेटला आहे. अफगाणच्या हेलमंद प्रांतात चगई जिल्ह्यालगत सीमेवर तालिबानने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ले केले. उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

बलुचिस्तान पेटले

बलुच लिबिरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराला चकवा देत सोराब शहरावर पूर्ण ताबा मिळवला असून या भागातील सर्व बँका, पोलिस ठाणी आणि सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवल्याचा दावा बीएलएचे प्रवक्ते जियांद बलूच यांनी माध्यमांना माहिती देताना केला.

जम्मू-काश्मीर, गुजरातसह ६ राज्यांमध्ये ब्लॅकआउट

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन शिल्ड’ अंतर्गत शनिवारी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये दिवसा मॉक ड्रिल करण्यात आल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता, या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी संबंधित भागांत सायरनचे मोठ्याने आवाज ऐकू आले. त्यापूर्वी या राज्यांत संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मॉक ड्रिलचा भाग म्हणून एअर स्ट्राइक ड्रिल आयोजित केली होती. जखमींना वाचवणे, वैद्यकीय मदत देणे, आग लागल्यास अग्निशमन दलाकडून त्वरित प्रतिसाद इत्यादी बाबींचा सराव करण्यात आला.

यापूर्वी ब्लॅकआउट कधी?

७ मे रोजी देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २४४ शहरांमध्ये १२ मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला. गृह मंत्रालयाने या शहरांना नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केले होते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान