शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:21 IST

भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.

सिंगापूर : पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारतीय विमानांची हानी झाल्याचे भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अप्रत्यक्ष मान्य केले. परंतु भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. विमाने का पाडली गेली याची कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

चौहान हे सिंगापूरमध्ये शांग्रीला संवाद परिषदेत सहभागी होण्यासाठी  गेले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझ्या मते, विमान पाडण्यात आले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या कारणांमुळे ते पाडले हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही आखलेल्या डावपेचांतील चुका आमच्या लक्षात आल्या. त्या आम्ही सुधारल्या आणि पुन्हा दोन दिवसांनी अमलात आणल्या. आम्ही पुन्हा हवाई हल्ले करून ठरविलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. 

पाकिस्तानचा दावा काय?

७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली, ज्यामध्ये ५ भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. पाच विमानांमध्ये ३ राफेल होते. नंतर, पाकने ६ भारतीय विमाने पाडल्याचा दावा करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले एअर मार्शल भारती?

भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन्स विभागाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मे रोजी पत्रकारांना सांगितले होते की, लढाईमध्ये हानी होतच असते. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले भारतीय हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षित परत आले.

पाक चेकपोस्टवर तालिबानचा हल्ला

काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान-सिंध प्रांतात स्वातंत्र्य लढा पेटत असताना अफगाणिस्तानशीही आता सीमावाद पेटला आहे. अफगाणच्या हेलमंद प्रांतात चगई जिल्ह्यालगत सीमेवर तालिबानने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ले केले. उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

बलुचिस्तान पेटले

बलुच लिबिरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराला चकवा देत सोराब शहरावर पूर्ण ताबा मिळवला असून या भागातील सर्व बँका, पोलिस ठाणी आणि सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवल्याचा दावा बीएलएचे प्रवक्ते जियांद बलूच यांनी माध्यमांना माहिती देताना केला.

जम्मू-काश्मीर, गुजरातसह ६ राज्यांमध्ये ब्लॅकआउट

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन शिल्ड’ अंतर्गत शनिवारी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये दिवसा मॉक ड्रिल करण्यात आल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता, या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी संबंधित भागांत सायरनचे मोठ्याने आवाज ऐकू आले. त्यापूर्वी या राज्यांत संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मॉक ड्रिलचा भाग म्हणून एअर स्ट्राइक ड्रिल आयोजित केली होती. जखमींना वाचवणे, वैद्यकीय मदत देणे, आग लागल्यास अग्निशमन दलाकडून त्वरित प्रतिसाद इत्यादी बाबींचा सराव करण्यात आला.

यापूर्वी ब्लॅकआउट कधी?

७ मे रोजी देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २४४ शहरांमध्ये १२ मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला. गृह मंत्रालयाने या शहरांना नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केले होते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान