शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजदचे नेते करू लागले नितीशकुमारांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:17 IST

भ्रष्टाचार, सुशासनाचा केला पर्दाफाश

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडी सरकारची स्थापना केल्यानंतर त्यांच्या अडचणी मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. राजदच्या कोट्यातून मंत्री बनलेल्या नेत्यांकडून नितीशकुमार सरकारवर सातत्याने टीका होत आहे. हे नेते सरकारमधील भ्रष्टाचाराबाबत नितीशकुमार यांना आरसा दाखविण्याचे काम करत आहेत. 

राज्याचे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांनी आपल्या विभागातील भ्रष्टाचाराबाबत जी विधाने केली त्यामुळे नितीशकुमार सरकारसमोर नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. हे प्रकरण शांत होत नाही तोच राजद कोट्यातील सहकारमंत्री सुरेंद्र यादव यांच्यासमोर राजदच्याच एका नेत्याने सुशासनाचा पर्दाफाश केला. वैशाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष विष्णुदेव राय यांनी भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. आपल्याच बँकेतील भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केला. अधिकाऱ्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, कोंबडीचे अंडे खाल्ले तर ठीक आहे. मात्र, येथे जिल्ह्यातील अधिकारी कोंबडीच खाऊन बसले. 

जिल्हा बँकेचे अधिकारी आणि बँकेचे मुख्य संचालक मिळून गरीब जनतेचा पैसा लुटत आहेत. सहकारी बँकेच्या १५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा बैठकीत झाला. अधिकाऱ्यापासून ते सरकारमधील मोठ्या पदावरील लोकांपर्यंत या प्रकरणावर कोणीही बोलत नाही. विष्णुदेव राय हे राजदचे नेते आहेत. त्यामुळे मंत्री सुरेंद्र यादव यांनी त्यांचे हे आरोप गांभीर्याने घेतले आहेत. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देऊ, असे मंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार