शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाडे स्वीकारले तरी जागा रिकामी करण्याचा मालकास अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 16:06 IST

भाडेपट्टीची मुदत संपली असताना जमीन मालकाने करार संपुष्टात येण्याची कोणतीही पूर्वसूचना देण्याची गरज नाही असा निकाल देत भाडेकरूला दुकान रिकामे करण्याचे निर्देश दिले. 

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली - भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तेचे भाडे भाडेपट्टीची मुदत संपल्यावरही जागा मालकाने स्वीकारवे तरी त्याचा अर्थ असा नाही की, जमीन मालकाने भाडेपट्टीच्या समाप्तीचा अधिकार सोडून दिला आहे. त्यामुळे भाड्याने दिलेली मालमत्ता रिकामी करण्याचे आदेश देता येतात असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

के एम मंजुनाथने बंगळुरू येथे इराप्पा यांच्या मालकीचे दुकान भाड्याने घेतले होते. १९८९, १९९०, १९९१, १९९२, १९९४ आणि १९९५ मध्ये त्यांच्यात ११ महिन्यांचा अनोंदणीकृत भाडेपट्टा करार करण्यात आला

१९९५ नंतर भाडेपट्टा वाढविण्यात आला नाही आणि करार केला गेला नाही. दुकान रिकामे करण्याची जागा मालकाची विनंती भाडेकरूने फेटाळली. भाडेकरूने जागा मालकाच्या बँक खात्यात भाडे जमा करणेही सुरूच ठेवले. याला जागा मालकाने आक्षेपही घेतला नाही. २०१३ मध्ये जमीन मालकाने दुकान रिकामा करून मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. 

भाडेकरूने कोर्टाच असा युक्तीवाद केला की, त्याला मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम १०६ नुसार, भाडेकरार संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक असलेली नोटीस मिळाली नाही. त्यामुळे जागा रिकामी करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकत नाही. 

हा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने जागामालकाचा दावा फेटाळून लावला. इराप्पा यायंनी या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात रिव्हिजन दाखल केले. 

कर्नाटक हायकोर्टाने अपील मान्य करताना जेव्हा भाडेकरार विशिष्ट कलावधीसाठी असेल तेव्हा भाडेपट्टीचा कालावधी संपल्यावर करार समाप्तीची नोटीस देणे आवश्यक नसते, असा निर्णय दिला. भाडेकरूने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले. जागामालकाने न्यायालयात दावा दाखल करेपर्यंत म्हणजेच १९९५ ते २०१३ पर्यंत तब्बल १८ वर्षे भाडे स्वीकारले आहे. याशिवाय भाडेपट्टी करार वैधपणे संपुष्टात आलेला नाही. म्हणून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे आवश्यक आहे असा युक्तिवाद भाडेकरूकडून करण्यात आला. हा युक्तिवाद अमान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जागा मालकाच्या बाजुने निकाल दिला. 

भाडेपट्टीची मुदत संपली असताना जमीन मालकाने करार संपुष्टात येण्याची कोणतीही पूर्वसूचना देण्याची गरज नाही असा निकाल देत भाडेकरूला दुकान रिकामे करण्याचे निर्देश दिले. 

भाडेपट्ट्याचा कालावधी संपल्यावर जमीनमालकांने केवळ भाडे स्वीकारणे म्हणजे जागामालकाने भाडेपट्टी संपुष्टात आणण्याचा आपला हक्क सोडला असे नाही. भाडे करारात निश्चित केलेली मुदत संपल्यावर भाडेकरू मालमत्चा हस्तांतरण कायद्याच्या कलम १०६व अंतर्गत नोटीस मिळण्यास पात्र नाही. मुदत संपलेला करार संपुष्टात आणण्यासाठी पुन्हा सूचना देणे आवश्यक नसते. 

- न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार आणि सुधांशू धुलिया