शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:20 IST

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

नवी दिल्ली - सध्या गाजत असलेल्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाने ९० च्या दशकाच्या सुरुवातील काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्यावर आलेल्या पलायनाच्या वेळेचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आले आहे, ते पूर्णपणे वास्तवाच्या आधारावर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जम्मू काश्मीरमधील रहिवासी असलेले हिंदू जे पंचगौडा ब्राह्मण समुहाशी संबंधित सारस्वत ब्राह्मण समुहाचा भाग आहेत त्यांना काश्मिरी पंडित म्हटले जाते. १९९० मध्ये जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पेटला तेव्हा काश्मिरी पंडितांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून हाकलण्यात आले. काश्मीरमधून सुमारे ४४ हजार ६८४ काश्मिरी पंडित विस्थापित झाले आहेत. त्यामध्ये १ लाख ५४ हजार ७१२ लोकांचा समावेश आहे, असे यावर्षी सरकारने राज्यसभेमध्ये सांगितले होते. तर गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १९८९नंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामध्ये २१९ काश्मिरी पंडितांची हत्या झाली होती.

काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा खोऱ्यामध्ये वसवण्यासाठी ९२० कोटी रुपये खर्च करून ६ हजार ट्रान्झिस्ट घरे तयार करण्यात येत आहेत. तसेच गेल्या सहा वर्षांमध्ये ६१० काश्मिरी पंडितांना त्यांची जमीन परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत सरकारने तरतूद केलेल्या नोकऱ्यांमुळे सुमारे ३ हजार ८०० काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परतले आहेत. तसेच केंद्र सरकारकडून काश्मिरी पंडितांना दरमहा आर्थिक मदत आणि धान्य दिले जाते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सPoliticsराजकारण