शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

नवरदेवानं ११.५१ लाख रुपये केले परत, फक्त १ रुपया अन् श्रीफळ घेत लग्न केलं, वधू पित्याच्या डोळ्यात अश्रू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 10:17 IST

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले

पाली-

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले आणि हे पाहून वधूच्या पित्याचे डोळे पाणावले. नवरदेवानं शगुन म्हणून फक्त १ रुपया आणि श्रीफळ घेत लग्न मंडपात विवाहसाठी उभा राहिला आहे. ही घटना पाहून गावातील सर्वच चक्रावले आणि या लग्नाची चर्चा फक्त त्याच गावात नव्हे, तर जवळपासच्या सर्व गावात चर्चेचा विषय ठरत आहे. 

जैतारण तहसीलमध्ये सांगावास तंवरोमधील ढाणी निवासी अमर सिंह तंवर यांचं लग्न २२ फेब्रुवारी रोजी नागौर जिल्ह्यातील हुडील गावातील रहिवासी प्रेम सिंह शेखावत यांची कन्या बबिता कंवर हिच्याशी झालं. लग्न सोहळ्यात मंडपात सर्व विधी होत असताना अमर सिंह यांनी वधूच्या वडिलांना सांगितलं की ते कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाहीत. राजपूत समाजातील लोकांसह सर्वांनी अमर सिंग तंवर यांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं. 

अमर सिंह तंवर यांची वरात हुडिला जिल्ह्यातील नागौरी येथे आली होती. त्यावेळी सर्व विधी पार पाडले गेले. यातील तिलक विधीमध्ये नवरदेवाला ११ लाख ५१ हजार रुपये भेट म्हणून दिले गेले. पण तंवर यांनी राजपूत समाजाला संदेश देण्याच्या उद्देशानं तिलक विधीत मिळालेली सर्व रक्कम वधूच्या वडिलांना परत दिली. 

तीन पीढ्यांपासून करताहेत देशसेवाअमर सिंह तंवर हे लष्करात सैनिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील भंवर सिंह देखील लष्करात होते. अमर सिंह यांची पोस्टिंग सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे आहे. तंवर यांच्या तीन पीढ्या देशसेवा करत आहेत. अमर सिंह यांचे वडील भंवर सिंह लष्करात सुभेदार मेजर होते आणि आजोबा बहादुर सिंह यांनी १९७१ साली भारत-पाक युद्ध, १९६५ साली भारत-चीन युद्धात देशाची सेवा केली होती. 

तिलकची प्रथा बंद करण्याचं केलं आवाहनतंवर यांनी राजपूत समाज आणि इतर समस्त समाजांना तिलक प्रथेमध्ये नवरदेवाला दिल्या जाणाऱ्या पैशांची प्रथा बंद करावी असं आवाहन केलं आहे. यामुळे गरीब कुटुंबावर खूप दडपण येतं असंही ते म्हणाले. प्रेम सिंग शेखावत यांची कन्या बबीता हिच्या लग्नात जेव्हा तिलक विधीवेळी नवरदेव अमर सिंह यांनी पैसे परत केले तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसंच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत केलं.