शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नवरदेवानं ११.५१ लाख रुपये केले परत, फक्त १ रुपया अन् श्रीफळ घेत लग्न केलं, वधू पित्याच्या डोळ्यात अश्रू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 10:17 IST

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले

पाली-

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले आणि हे पाहून वधूच्या पित्याचे डोळे पाणावले. नवरदेवानं शगुन म्हणून फक्त १ रुपया आणि श्रीफळ घेत लग्न मंडपात विवाहसाठी उभा राहिला आहे. ही घटना पाहून गावातील सर्वच चक्रावले आणि या लग्नाची चर्चा फक्त त्याच गावात नव्हे, तर जवळपासच्या सर्व गावात चर्चेचा विषय ठरत आहे. 

जैतारण तहसीलमध्ये सांगावास तंवरोमधील ढाणी निवासी अमर सिंह तंवर यांचं लग्न २२ फेब्रुवारी रोजी नागौर जिल्ह्यातील हुडील गावातील रहिवासी प्रेम सिंह शेखावत यांची कन्या बबिता कंवर हिच्याशी झालं. लग्न सोहळ्यात मंडपात सर्व विधी होत असताना अमर सिंह यांनी वधूच्या वडिलांना सांगितलं की ते कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाहीत. राजपूत समाजातील लोकांसह सर्वांनी अमर सिंग तंवर यांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं. 

अमर सिंह तंवर यांची वरात हुडिला जिल्ह्यातील नागौरी येथे आली होती. त्यावेळी सर्व विधी पार पाडले गेले. यातील तिलक विधीमध्ये नवरदेवाला ११ लाख ५१ हजार रुपये भेट म्हणून दिले गेले. पण तंवर यांनी राजपूत समाजाला संदेश देण्याच्या उद्देशानं तिलक विधीत मिळालेली सर्व रक्कम वधूच्या वडिलांना परत दिली. 

तीन पीढ्यांपासून करताहेत देशसेवाअमर सिंह तंवर हे लष्करात सैनिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील भंवर सिंह देखील लष्करात होते. अमर सिंह यांची पोस्टिंग सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे आहे. तंवर यांच्या तीन पीढ्या देशसेवा करत आहेत. अमर सिंह यांचे वडील भंवर सिंह लष्करात सुभेदार मेजर होते आणि आजोबा बहादुर सिंह यांनी १९७१ साली भारत-पाक युद्ध, १९६५ साली भारत-चीन युद्धात देशाची सेवा केली होती. 

तिलकची प्रथा बंद करण्याचं केलं आवाहनतंवर यांनी राजपूत समाज आणि इतर समस्त समाजांना तिलक प्रथेमध्ये नवरदेवाला दिल्या जाणाऱ्या पैशांची प्रथा बंद करावी असं आवाहन केलं आहे. यामुळे गरीब कुटुंबावर खूप दडपण येतं असंही ते म्हणाले. प्रेम सिंग शेखावत यांची कन्या बबीता हिच्या लग्नात जेव्हा तिलक विधीवेळी नवरदेव अमर सिंह यांनी पैसे परत केले तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसंच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत केलं.