शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गरिबांचा उद्धार हाच सरकारचा उद्देश, एक लाख लाभार्थ्यांना ५४० कोटींचा हप्ता - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:08 IST

आपल्या सरकारची मागील १० वर्षे गरिबांसाठी समर्पित आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ’ (पीएम-जनमन) अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या एक लाख आदिवासी लाभार्थ्यांना ५४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी जारी केला. आपल्या सरकारची मागील १० वर्षे गरिबांसाठी समर्पित आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या तरच देशाचा विकास होऊ शकतो आणि प्रत्येकाला अगदी दुर्गम भागातील लोकांनाही त्याचा फायदा होईल याची गॅरंटी आपण देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, आपण अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभापर्यंत विशेष धार्मिक अनुष्ठान सुरू केले असताना शबरी यांची आठवण होणे स्वाभाविक आहे. 

राष्ट्रपती मुर्मू यांना श्रेयमोदींनी पंतप्रधान-जनमन योजनेसाठी भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनाचे श्रेय दिले आणि सांगितले की, त्याच पार्श्वभूमीतून आलेली व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल अनेकदा सांगितले.

शिष्यवृत्तीत केली अडीचपट वाढअनुसूचित जमातींसाठीच्या अनेक कल्याणकारी योजनांचा निधी पाच पटीने वाढला असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत गेल्या दहा वर्षांत अडीच पट वाढ झाली आहे, आणखी ५०० पेक्षा जास्त एकलव्य मॉडेल शाळांचे बांधकाम सुरू आहे. पूर्वी अशा फक्त ९० शाळा अस्तित्वात होत्य, असे पंतप्रधान म्हणाले.

चार कोटींहून अधिक घरेत्रेतायुगातील राजा रामाची गोष्ट असो किंवा सद्यस्थिती असो, गरीब, वंचित आणि आदिवासींच्या उन्नतीशिवाय सर्वांचे कल्याण शक्य नाही. गेल्या १० वर्षांत गरिबांसाठी चार कोटींहून अधिक कायमस्वरूपी घरे बांधण्यात आली आहेत. आम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचलो आहोत ज्यांची यापूर्वी कधीही काळजी घेतली गेली नव्हती, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी