शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार! भारताचे म्हणणे आता जग ऐकते: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:05 IST

१८व्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त ओडिशातील भुवनेश्वर येथील कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना

भुवनेश्वर: आता सारे जग भारताचे म्हणणे ऐकते. भविष्य हे युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे (शांतता) घडणार आहे, असे आपला देश महान सांस्कृतिक वारशामुळे साऱ्या जगाला सांगू शकतो, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. ९)  सांगितले. 

१८व्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, भारत हा केवळ लोकशाहीचा जनक नाही तर लोकशाही भारतीयांच्या जीवनशैलीचा घटक आहे. जगात तलवारीच्या जोरावर साम्राज्यांचा विस्तार होत असताना सम्राट अशोकाने शांततेचा मार्ग स्वीकारला होता. भारताचा हाच सांस्कृतिक वारसा आहे. भविष्य हे युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार आहे हा विचार भारत आज जगाला ठामपणे सांगत आहे. जगातील विविध देशांत भारतीय राहातात. ते त्या देशांतील भारताचे दूत आहेत, असे आमचे केंद्र सरकार मानते. 

पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले की, लोकशाही हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्याला विविधता शिकवावी लागत नाही, कारण आपले जीवनच विविधतेवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय ज्या देशात राहातात तेथील समाजात ते सहज मिसळून जातात. भारतीय ज्या देशात राहातात तेथील नियम, परंपरा यांचा आदर करतात. त्या देशाच्या प्रगतीत प्रामाणिकपणे योगदान देतात.

प्रवासी संमेलनात चार प्रदर्शनांचे केले उद्घाटन

  • ओडिशात आयोजिलेल्या प्रवासी भारतीय दिन संमेलनात भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि प्रवासी भारतीयांचे योगदान या विषयांवरील चार प्रदर्शनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.
  • रामायण, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवासी भारतीयांचे योगदान, विकसित भारत घडविण्याचे ध्येय आदी विषयांची माहिती या प्रदर्शनांमध्ये देण्यात आली आहे. 
टॅग्स :Odishaओदिशाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी