शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:27 IST

सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे यूपी सरकारकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारवर बुलडोझर कारवाईवर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 'बुलडोझर कारवाई'च्या निर्णयाबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. यात म्हटले आहे की, सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य. या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, यामुळे माफिया घटक आणि संघटित व्यावसायिक गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. कायद्याचे राज्य सर्वांना लागू होते. हा आदेश दिल्लीच्या संदर्भात असला तरी उत्तर प्रदेश सरकार त्यात सहभागी नव्हते. हा खटला जमियत उलेमा-ए-हिंद विरुद्ध उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि इतरांशी संबंधित होता.

बुलडोझर कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना टीका केली होती. तसेच बुलडोझरच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली. निकाल देताना न्यायालयाने ठणकावून सांगितले की, कोणत्याही प्रकरणात एखादा आरोपी किंवा दोषी आढळला तरीही घर पाडणे योग्य नाही.

कोर्टाने सांगितले की, आम्ही या विषयावरील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला असून सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा आदेश दिला आहे. कारण, प्रत्येक परिस्थितीत कायद्याचे राज्य असणे महत्त्वाचे आहे. बुलडोझरची कारवाई पक्षपाती असू शकत नाही. जर घर चुकीच्या पद्धतीने पाडले असेल तर पीडितेला नुकसान भरपाई मिळावी. 

बुलडोझर कारवाईची मनमानी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. अधिकारी मनमानी पद्धतीने काम करू शकत नाहीत. एखाद्या खटल्यात एकच आरोपी असेल तर घर पाडून संपूर्ण कुटुंबाला शिक्षा का?, असा सवालही कोर्टाने केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या बुलडोझर कारवाईच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री मायावती, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मायावती म्हणाल्या की, बुलडोझरची सावली दहशत आता नक्कीच संपेल. एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की,बुलडोझर पाडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर, अशी अपेक्षा केली पाहिजे की यूपी आणि इतर राज्य सरकार सार्वजनिक हित आणि कल्याण सुरळीतपणे व्यवस्थापित करतील आणि बुलडोझरची दहशत नक्कीच संपेल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ