शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:27 IST

सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे यूपी सरकारकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारवर बुलडोझर कारवाईवर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 'बुलडोझर कारवाई'च्या निर्णयाबाबत उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. यात म्हटले आहे की, सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य. या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, यामुळे माफिया घटक आणि संघटित व्यावसायिक गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. कायद्याचे राज्य सर्वांना लागू होते. हा आदेश दिल्लीच्या संदर्भात असला तरी उत्तर प्रदेश सरकार त्यात सहभागी नव्हते. हा खटला जमियत उलेमा-ए-हिंद विरुद्ध उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि इतरांशी संबंधित होता.

बुलडोझर कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना टीका केली होती. तसेच बुलडोझरच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली. निकाल देताना न्यायालयाने ठणकावून सांगितले की, कोणत्याही प्रकरणात एखादा आरोपी किंवा दोषी आढळला तरीही घर पाडणे योग्य नाही.

कोर्टाने सांगितले की, आम्ही या विषयावरील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला असून सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा आदेश दिला आहे. कारण, प्रत्येक परिस्थितीत कायद्याचे राज्य असणे महत्त्वाचे आहे. बुलडोझरची कारवाई पक्षपाती असू शकत नाही. जर घर चुकीच्या पद्धतीने पाडले असेल तर पीडितेला नुकसान भरपाई मिळावी. 

बुलडोझर कारवाईची मनमानी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. अधिकारी मनमानी पद्धतीने काम करू शकत नाहीत. एखाद्या खटल्यात एकच आरोपी असेल तर घर पाडून संपूर्ण कुटुंबाला शिक्षा का?, असा सवालही कोर्टाने केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या बुलडोझर कारवाईच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री मायावती, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मायावती म्हणाल्या की, बुलडोझरची सावली दहशत आता नक्कीच संपेल. एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की,बुलडोझर पाडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर, अशी अपेक्षा केली पाहिजे की यूपी आणि इतर राज्य सरकार सार्वजनिक हित आणि कल्याण सुरळीतपणे व्यवस्थापित करतील आणि बुलडोझरची दहशत नक्कीच संपेल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ