शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:52 IST

यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.

दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे. मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.

कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते -यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या,  (CM Atishi) दिल्लीतील लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते.

"या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे," असेही आतिशी म्हणाल्या.

या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणार मदत - 

संजय मनचंदा, फार्मासिस्ट एसडीएमसी -मनचंदा हे कोरोना काळात एसडीएमसी पेशन्ट केअर फॅसिलिटीमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. याशिवाय, ते आशा वर्कर्स आणि एएनएमसोबत कंटेनमेंट झोनलाही भेट देत होते. सेवेवर असतानाच त्याला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

रवि कुमार सिंह -रवी कुमार हे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. येथे कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

वीरेंद्र कुमार -वीरेंद्र कुमार एक सफाई कर्मचारी होते, ते कोरोना काळात भूक निवारण केंद्रातील साफसफाईचे काम बघत होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.

भवानी चंद्र -भवानी चंद्रा हे दिल्ली पोलिसात एएसआय होत्या, ते कोरोना काळात लोकनायक रुग्णालयात ड्युटीवर होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

मो. यासीन -मोहम्मद यासीन एमसीडीमध्ये प्राथमिक शिक्षक होते. कोरोना काळात, मोहम्मद यासीन रेशन वितरण कर्तव्यावर होते. यादरम्यान, त्यांनाही कोरोना संसर्ग झाला आणि काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Atishiआतिशीcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी