शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगानं आपली प्रतिमा जपायला हवी; माजी निवडणूक आयुक्त कुरैशी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 22:42 IST

माजी निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं मत.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मुख्य निवडणूक आयुक्त (Former CEC) एस. व्हाय. कुरैशी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. "निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा जपली पाहिजे. जनता सर्व काही पाहते. चांगली प्रतिमा असती तर फायदा होतो. लोकांनी बोट दाखवलं नसतं, लोकांनी समजून घेतले असते. चांगली प्रतिमा फायद्याची असते," असे ते म्हणाले.

काही पक्षांनाच निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली, या विरोधकांच्या आरोपाबाबत कुरैशी यांना सवाल करण्यात आला. "मी या गोष्टीचा अभ्यास केलेला नाही, पण नोटीस कुणाला मिळाली, कुणाला गेली नाही, हे सर्वांना माहीत आहे. एकमेकांविरोधात तक्रारी वाढवून सांगितल्या जातात. निवडणूक आयोग हे सर्व पाहतो. याबाबत चर्चा होते," असेही ते म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये नोंदणीकृत पक्षाला मान्यता देण्यासंदर्भातील आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, "मला त्याची पार्श्वभूमी माहित नाही. ३ दिवसांची नोटीस बदलून ७ दिवस करण्यात आली. निवडणुकीच्या आधी लोकांना आरोपांची संधी मिळते. हाच प्रकार ६ महिन्यांपूर्वी घडला असता तर काहीही झाले नसते," असेही त्यांनी स्पष्ट केले.

"निवडणूक आयोगाचे निरीक्षक असतात. स्थानिक एसपी, डीएम यांचा अहवालही घेतला जातो. निवडणूक आयोग अहवालानुसार निर्णय घेतात. पुरावे तर हवेच असतात. कुणी जर हवेत तक्रार केली तर त्याचे काही होत नाही. पुरावे असतील त्याकडे पाहिले जाते, वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. याशिवाय गरज भासल्यास फील्डवरून अहवाल मागवला जातो, डीएमची आवृत्ती मागवली जाते," असेही ते म्हणाले.

खर्चाची मर्यादा सर्वांसाठी सारखीचपक्षाच्या प्रचारावरील खर्चाच्या प्रश्नावर कुरेशी म्हणाले, 'व्हर्च्युअल रॅलीची साधने नाहीत, तर सामान्य रॅलीची साधने आवश्यक असतात. गर्दीवर लाखोंचा खर्च होतो आणि तेदेखील करत असतील तर त्याचं काही उत्तर नाही. मर्यादा सर्वांसाठी समानच आहे," असे कुरैशी म्हणाले. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पहिलेच केली जात होती, मात्र काही वर्षांपूर्वी त्यात बदल करण्यात आला. मार्जिन लीड जर कमी आहे आणि मते अधिक असतील तर ती फसवणूक आहे. त्यानंतर वाद सुरू होतात. ही प्रकरणे सुरुवातीलाच घ्यावीत, त्यामुळे ही शंका दूर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत