शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१४ कोटी तरुणांना रोजगार देणार, अर्थव्यवस्था लवकरच ‘टॉप ३’ मध्ये येणार -  नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:57 IST

५१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, वाहन, औषधी, पर्यटन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे आणि तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगवान विकासासाठी तयार आहे आणि यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आपली अर्थव्यवस्था लवकरच आघाडीच्या तीन देशांत सहभागी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.५१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, वाहन, औषधी, पर्यटन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे आणि तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. एकट्या पर्यटन क्षेत्राने २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेत २० लाख कोटी रुपयांचे योगदान देणे अपेक्षित आहे आणि १३-१४ कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. देशभरात ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

९ वर्षांत ९ लाख दिल्या नोकऱ्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या नऊ वर्षांत रोजगारांमध्ये वाढ झाली असून, या काळात देशातील तरुणांना नऊ लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, असा दावा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केला.  ते म्हणाले की, यूपीएच्या २००४ ते २०१३ या काळात सहा लाख नोकऱ्या देण्यात आल्या, तर सध्याच्या सरकारच्या काळात नऊ लाख नोकऱ्या देण्यात आल्या असून, त्यात ६० ते ७० टक्क्यांची वाढ झाली आहे.

२ कोटी नोकऱ्यांचे काय?पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल अस्वस्थ वाटत असल्याने ते रोजगार मेळावे घेत आहेत आणि आपली प्रतिमा वाचवू इच्छित आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर केली. प्रतिवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी