शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

वाहन धडकण्याआधीच चालकाला कळणार; अपघात टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 09:22 IST

मंत्रालयाने या संदर्भातील मसुद्यात ऑटोमोबाइल उद्योगांसाठी एमओआयएसची मानके निश्चित केली आहेत. 

नवी दिल्ली : अनेकदा वाहन चालवत असताना ब्रेक न लागणे किंवा अन्य कारणांमुळे वाहन पुढील वाहनांना,  पादचारी आणि सायकलस्वार यांच्यावर आदळते. यामुळे लाखो जणांचा दरवर्षी मृत्यू होतो. त्यामुळे आता वाहन टक्कर देण्याआधीच नियंत्रित होणार असून, अपघात टळणार आहेत. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी चारचाकी, प्रवासी आणि  व्यावसायिक वाहनांमध्ये  ‘मूव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एमओआयएस) प्रणाली लावण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ही यंत्रणा टक्कर होण्याआधीच इशारा देईल. मंत्रालयाने या संदर्भातील मसुद्यात ऑटोमोबाइल उद्योगांसाठी एमओआयएसची मानके निश्चित केली आहेत. 

प्रत्येक तासाला १९ नागरिकांचा मृत्यू

२०२२ मध्ये भारतात रस्ते अपघातांची संख्या २०२१ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून ४.६ लाखांवर पोहोचली आहे. यात प्रत्येक तासाला १९ नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे रस्ते मंत्रालयाच्या या प्रस्तावाला महत्त्व निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२४ पर्यंत देशातील अपघात आणि मृत्यूची संख्या निम्मी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

टॅग्स :Accidentअपघात