शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आई होण्याचे स्वप्न लहान वयातच भंग पावतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:55 IST

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते.

नवी दिल्ली :

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते. मात्र, बदलती दिनचर्या, रोजचा आहार, मद्यपान, बिघडलेली हार्मोनची स्थिती, उशिरा लग्न करणे यामुळे सध्या महिलांना ३० ते ३५ वयातच स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ३५ पेक्षा अधिक वय असतानाही आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये रजोनिवृत्तीचे प्रमाण १.५% होते २०२१-२०२२ मध्ये वाढ होत २.१% झाले आहे.

जीवनशैलीतील बदल ठरतोय धोक्याचामहिला डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर दर महिन्याला ३ ते ४ केसेस येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानमध्ये रजोनिवृत्तीच्या समस्या येत आहेत. मुंबईमध्येही अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महिलांच्या जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम मासिक पाळीवर होत आहे.

कोणता हार्मोन धोकादायक? बहुतेक महिलांमध्ये अँटी म्युलेरियन हार्मोन (एएमएच) पातळी १ एनजी/ एमएलपेक्षा कमी असते. यामुळे गर्भधारणेतील समस्या व्यतिरिक्त वयाच्या आधी मासिक पाळी बंद होते. धूम्रपान व अल्कोहोलमुळेदेखील हार्मोनल असंतुलन होत या समस्या उद्भवतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.मेट्रो शहरातील बहुतांश तरुण-तरुणी उशिरा लग्न करतात. याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढू लागते. - डॉ. शालिनी राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञलक्षणे काय? कमी झोप, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, लघवी संसर्ग, अचानक घाम येणे, चिडचिड, नैराश्य, राग-मूड बदलणे, अनियमित मासिक पाळी येणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे ही रजोनिवृत्ती येण्याची लक्षणे आहेत.काय कराल? रजोनिवृत्ती दरम्यान जास्तीत जास्त वेळ सैल कपडे घाला. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योगासने, व्यायाम, सकस आहार, भरपूर पाणी प्या, तळलेल्या आणि गरम अन्नापासून दूर राहा.