शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

आई होण्याचे स्वप्न लहान वयातच भंग पावतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 06:55 IST

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते.

नवी दिल्ली :

साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते. मात्र, बदलती दिनचर्या, रोजचा आहार, मद्यपान, बिघडलेली हार्मोनची स्थिती, उशिरा लग्न करणे यामुळे सध्या महिलांना ३० ते ३५ वयातच स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ३५ पेक्षा अधिक वय असतानाही आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये रजोनिवृत्तीचे प्रमाण १.५% होते २०२१-२०२२ मध्ये वाढ होत २.१% झाले आहे.

जीवनशैलीतील बदल ठरतोय धोक्याचामहिला डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर दर महिन्याला ३ ते ४ केसेस येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानमध्ये रजोनिवृत्तीच्या समस्या येत आहेत. मुंबईमध्येही अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महिलांच्या जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम मासिक पाळीवर होत आहे.

कोणता हार्मोन धोकादायक? बहुतेक महिलांमध्ये अँटी म्युलेरियन हार्मोन (एएमएच) पातळी १ एनजी/ एमएलपेक्षा कमी असते. यामुळे गर्भधारणेतील समस्या व्यतिरिक्त वयाच्या आधी मासिक पाळी बंद होते. धूम्रपान व अल्कोहोलमुळेदेखील हार्मोनल असंतुलन होत या समस्या उद्भवतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.मेट्रो शहरातील बहुतांश तरुण-तरुणी उशिरा लग्न करतात. याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढू लागते. - डॉ. शालिनी राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञलक्षणे काय? कमी झोप, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, लघवी संसर्ग, अचानक घाम येणे, चिडचिड, नैराश्य, राग-मूड बदलणे, अनियमित मासिक पाळी येणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे ही रजोनिवृत्ती येण्याची लक्षणे आहेत.काय कराल? रजोनिवृत्ती दरम्यान जास्तीत जास्त वेळ सैल कपडे घाला. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योगासने, व्यायाम, सकस आहार, भरपूर पाणी प्या, तळलेल्या आणि गरम अन्नापासून दूर राहा.