शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘बम बम भोले’ म्हणत केदारनाथचे दरवाजे बंद;भाऊबीजेच्या पर्वावर महादेव ओंकारेश्वरकडे मार्गस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:50 IST

दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि एप्रिल-मे महिन्यात उघडण्यात येतात. 

रुद्रप्रयाग : हिवाळ्याला सुरुवात होताच चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाऊबीजेच्या पावन पर्वावर बंद झाले. यावेळी पारंपरिक पूजा आणि भारतीय सैन्याच्या बँड पथकाकडून भक्तिमय वातावरणात  सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि एप्रिल-मे महिन्यात उघडण्यात येतात. 

कडाक्याच्या थंडीतही हजारो भाविकांची गर्दी

कडाक्याच्या थंडीतही अडीच हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. ‘जय केदार’, ‘बम बम भोले’ तसेच ‘ओम नम: शिवाय’चा जयघोष करण्यात आला. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर केदारनाथाची पंचमुखी डोली हजारो भाविक आणि सैन्याच्या बँडपथकासोबत रामपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुढील वर्षी दरवाजे उघडेपर्यंत ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथाचे दर्शन घेता येईल.

१९.५० लाख भाविकांनी घेतले दर्शन

यंदा २५ एप्रिल २०२३ ला मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत १९.५० लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले.

चारधाम कधी होतात बंद ?

गंगोत्री -  १४ नोव्हेंबरकेदारनाथ - १५ नोव्हेंबरयमुनोत्री -  १५ नोव्हेंबरबद्रीनाथ - १८ नोव्हेंबर

टॅग्स :Kedarnathकेदारनाथ