शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींच्या ७३ किलो चांदीचा वारसदार कोण? आजवर कुणी केला नाही दावा! नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:14 IST

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मालकीची ७३ किलो चांदी गेल्या ५० वर्षांपासून बिजनौरच्या जिल्हा कोषागारात आहे. पण आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच त्यावर दावा केलेला नाही.

बिजनौर

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मालकीची ७३ किलो चांदी गेल्या ५० वर्षांपासून बिजनौरच्या जिल्हा कोषागारात आहे. पण आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच त्यावर दावा केलेला नाही. सध्याच्या दरानुसार चांदीची किंमत सुमारे ३३ ते ३४ लाख रुपये इतकी आहे.

चांदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सुपूर्द करण्यासाठी कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने पत्रंही लिहिली गेली आहेत. पण रिझर्व्ह बँकेनेही ती खासगी मालमत्ता असल्याचं सांगत ती ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यानंतर राज्य सरकारकडूनही मत मागवण्यात आलं होतं, पण तिथून कोणताही प्रतिसाद न आल्याने इंदिरा गांधींच्या मालकीची चांदी बिजनौरच्या तिजोरीत अजूनही पडून आहे. 

खरंतर आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण बिजनौरमधील कलागढ येथे बांधलं जाणार होतं. त्याचं बांधकाम चालू होतं आणि त्याबाबत आभार मानण्यासाठी बिजनौरच्या लोकांनी 1972 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कालागडला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. या बैठकीत कालागड धरणाच्या कामासाठी काम करणाऱ्या कामगारांनी व जिल्ह्यातील जनतेनं इंदिरा गांधींची चांदीनं तुला केली होती. ज्याचं वजन सुमारे ७२ किलो इतकं होतं. यासोबतच इतर काही भेटवस्तूंसह एकूण वजन ७३ किलोपर्यंत पोहोचलं होतं. 

बिजनौरच्या कोषागारात चांदी सुरक्षितचांदीनं तुला झाल्यानंतर तेथून निघताना इंदिरा गांधींनी ही भेट सोबत घेतली नाही. तत्कालीन प्रशासनानं ही चांदी बिजनौरच्या जिल्हा तिजोरीत ठेवली आणि तेव्हापासून आजतागायत इंदिरा गांधींचा हा ऐवज तिथंच ठेवण्यात आला आहे. तसंच कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने चांदी परत करण्यासाठी पत्रंही लिहिली गेली, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. 

गेल्या 50 वर्षांपासून तिजोरीत चांदी पडूनदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यानं दावा केला तरच ही चांदी परत करता येईल, असं जिल्ह्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी सूरज कुमार सिंह यांचं म्हणणं आहे. कोषागाराच्या नियमानुसार कोणतीही खासगी मालमत्ता एका वर्षापेक्षा जास्त काळ तिजोरीत ठेवता येत नाही. परंतु ही मालमत्ता मागील ५० वर्षांपासून जतन करुन ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस