शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींच्या ७३ किलो चांदीचा वारसदार कोण? आजवर कुणी केला नाही दावा! नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:14 IST

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मालकीची ७३ किलो चांदी गेल्या ५० वर्षांपासून बिजनौरच्या जिल्हा कोषागारात आहे. पण आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच त्यावर दावा केलेला नाही.

बिजनौर

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मालकीची ७३ किलो चांदी गेल्या ५० वर्षांपासून बिजनौरच्या जिल्हा कोषागारात आहे. पण आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीच त्यावर दावा केलेला नाही. सध्याच्या दरानुसार चांदीची किंमत सुमारे ३३ ते ३४ लाख रुपये इतकी आहे.

चांदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सुपूर्द करण्यासाठी कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने पत्रंही लिहिली गेली आहेत. पण रिझर्व्ह बँकेनेही ती खासगी मालमत्ता असल्याचं सांगत ती ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यानंतर राज्य सरकारकडूनही मत मागवण्यात आलं होतं, पण तिथून कोणताही प्रतिसाद न आल्याने इंदिरा गांधींच्या मालकीची चांदी बिजनौरच्या तिजोरीत अजूनही पडून आहे. 

खरंतर आशियातील सर्वात मोठं मातीचं धरण बिजनौरमधील कलागढ येथे बांधलं जाणार होतं. त्याचं बांधकाम चालू होतं आणि त्याबाबत आभार मानण्यासाठी बिजनौरच्या लोकांनी 1972 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कालागडला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. या बैठकीत कालागड धरणाच्या कामासाठी काम करणाऱ्या कामगारांनी व जिल्ह्यातील जनतेनं इंदिरा गांधींची चांदीनं तुला केली होती. ज्याचं वजन सुमारे ७२ किलो इतकं होतं. यासोबतच इतर काही भेटवस्तूंसह एकूण वजन ७३ किलोपर्यंत पोहोचलं होतं. 

बिजनौरच्या कोषागारात चांदी सुरक्षितचांदीनं तुला झाल्यानंतर तेथून निघताना इंदिरा गांधींनी ही भेट सोबत घेतली नाही. तत्कालीन प्रशासनानं ही चांदी बिजनौरच्या जिल्हा तिजोरीत ठेवली आणि तेव्हापासून आजतागायत इंदिरा गांधींचा हा ऐवज तिथंच ठेवण्यात आला आहे. तसंच कोषागार अधिकाऱ्यांच्या वतीने चांदी परत करण्यासाठी पत्रंही लिहिली गेली, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. 

गेल्या 50 वर्षांपासून तिजोरीत चांदी पडूनदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यानं दावा केला तरच ही चांदी परत करता येईल, असं जिल्ह्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी सूरज कुमार सिंह यांचं म्हणणं आहे. कोषागाराच्या नियमानुसार कोणतीही खासगी मालमत्ता एका वर्षापेक्षा जास्त काळ तिजोरीत ठेवता येत नाही. परंतु ही मालमत्ता मागील ५० वर्षांपासून जतन करुन ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस