शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 21:09 IST

Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे.

श्रीनगर - मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे. ज्या काश्मिरी पंडितांचं माता खीर भवानी हे कुलदैवत आहे त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिर खोऱ्यामध्ये काही आपत्ती येते तेव्हा जलकुंडाचा रंग बदलल्याने त्याचे संकेत मिळतात. तुलामुला गावात असलेल्या माता खीर भवानीच्या या मंदिराचे जलकुंड हे माता भवानीचेच स्वरूप मानले जाते. तसेच ते आपला रंग बदलून येणाऱ्या स्थितीचे संकेत देत असते.

गेल्या काही दिवसांपासून या जलकुंडाचा रंग लाल झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे येणारे आईचे भक्त चिंतीत आहे. एक महिला भक्त गुडी जुतशी यांनी सांगितले की, येथे १०-१५ दिवस झाले, पण कुंडातील पाण्याचा रंग अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. यापूर्वीही कुंडातील पाण्याचा रंग असाच झाला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. आता पुन्हा असा रंग झाला आहे. असे वाटते की, पुन्हा परिस्थिती बिघडणार आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा कुठलीही आपत्ती येणार असते, तेव्हा या जलकुंडातील पाणी बदलत राहते.

गुडी यांनी सांगितले की, कुंडातील पाण्याचा रंग बदलून तो लालसर झाला आहे. याचा अर्थ काही होणार आहे. रक्तपात होऊ शकतो. कारण जेव्हा पलायन झालं होतं तेव्हा पाण्याचा रंग काळा झाला होता. आमच्यापैकी काहीजण येथून निघून गेले होते. तर अनेक जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर कोरोनामध्येही मोठ्या प्रमामावर हानी झाली होती. आता पुन्हा असं होत आहे. याचा अर्थ जेव्हा राहुल भट्टचा मृत्यू झाला, त्याआधी काही दिवसांपूर्वी या कुंडातील पाण्याचा रंग बदलला होता. नंतर तो लालेलाल झाला. राहुल भट मारला गेला. आता पुढे काही वाईट होऊ नये, अशी अपेक्षा करूया.

या कुंडातील पाण्याचा रंग लाल, पिवळा किंवा काळा होऊ लागतो तेव्हा कुठलीतरी मोठी आपत्ती येईल, अशी श्रद्धा आहे. तर पांढरा, निळा किंवा सौम्य रंगाचे पाणी असेल तर ते शुभ मानले जाते. या कुंडातील पाण्याचा रंग बदलताना पाहिले गेले आहे. विशेषकरून ९० च्या दशकात जेव्हा काश्मीरमधील परिस्थिती बिघडली होती. तेव्हा यातील पाण्याचा रंग हा काळा झाला होता. त्यानंतर काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या झाल्या होत्या. १९९९ च्या कारगिल युद्धापूर्वी या जलकुंडातील पाण्याचा रंग लाल झाला होता. २०१४ मध्ये पूर येण्यापूर्वी यातील पाण्याचा रंग बदलला होता. तसेच कोविडपूर्वीही या तलावातील पाण्याचा रंग बदलला होता.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduismहिंदुइझमAdhyatmikआध्यात्मिक