शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 21:09 IST

Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे.

श्रीनगर - मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे. ज्या काश्मिरी पंडितांचं माता खीर भवानी हे कुलदैवत आहे त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिर खोऱ्यामध्ये काही आपत्ती येते तेव्हा जलकुंडाचा रंग बदलल्याने त्याचे संकेत मिळतात. तुलामुला गावात असलेल्या माता खीर भवानीच्या या मंदिराचे जलकुंड हे माता भवानीचेच स्वरूप मानले जाते. तसेच ते आपला रंग बदलून येणाऱ्या स्थितीचे संकेत देत असते.

गेल्या काही दिवसांपासून या जलकुंडाचा रंग लाल झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे येणारे आईचे भक्त चिंतीत आहे. एक महिला भक्त गुडी जुतशी यांनी सांगितले की, येथे १०-१५ दिवस झाले, पण कुंडातील पाण्याचा रंग अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. यापूर्वीही कुंडातील पाण्याचा रंग असाच झाला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. आता पुन्हा असा रंग झाला आहे. असे वाटते की, पुन्हा परिस्थिती बिघडणार आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा कुठलीही आपत्ती येणार असते, तेव्हा या जलकुंडातील पाणी बदलत राहते.

गुडी यांनी सांगितले की, कुंडातील पाण्याचा रंग बदलून तो लालसर झाला आहे. याचा अर्थ काही होणार आहे. रक्तपात होऊ शकतो. कारण जेव्हा पलायन झालं होतं तेव्हा पाण्याचा रंग काळा झाला होता. आमच्यापैकी काहीजण येथून निघून गेले होते. तर अनेक जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर कोरोनामध्येही मोठ्या प्रमामावर हानी झाली होती. आता पुन्हा असं होत आहे. याचा अर्थ जेव्हा राहुल भट्टचा मृत्यू झाला, त्याआधी काही दिवसांपूर्वी या कुंडातील पाण्याचा रंग बदलला होता. नंतर तो लालेलाल झाला. राहुल भट मारला गेला. आता पुढे काही वाईट होऊ नये, अशी अपेक्षा करूया.

या कुंडातील पाण्याचा रंग लाल, पिवळा किंवा काळा होऊ लागतो तेव्हा कुठलीतरी मोठी आपत्ती येईल, अशी श्रद्धा आहे. तर पांढरा, निळा किंवा सौम्य रंगाचे पाणी असेल तर ते शुभ मानले जाते. या कुंडातील पाण्याचा रंग बदलताना पाहिले गेले आहे. विशेषकरून ९० च्या दशकात जेव्हा काश्मीरमधील परिस्थिती बिघडली होती. तेव्हा यातील पाण्याचा रंग हा काळा झाला होता. त्यानंतर काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या झाल्या होत्या. १९९९ च्या कारगिल युद्धापूर्वी या जलकुंडातील पाण्याचा रंग लाल झाला होता. २०१४ मध्ये पूर येण्यापूर्वी यातील पाण्याचा रंग बदलला होता. तसेच कोविडपूर्वीही या तलावातील पाण्याचा रंग बदलला होता.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduismहिंदुइझमAdhyatmikआध्यात्मिक