शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:47 IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करत असल्याचे न्यायलयाने म्हटले.

महाराष्ट्राच्या मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय सुनावला असून, या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपींविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करत असल्याचे न्यायलयाने म्हटले. या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर या मुख्य आरोपी होत्या.   

न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर भावुक झाल्या. न्यायालयाच्या निर्णयावर त्या म्हणाल्या की, "हा माझा विजय नाही तर भगव्याचा विजय आहे. मला १७ वर्षे अपमानित करण्यात आले. एका संन्याशाला दहशतवादी बनवण्यात आले. हा हिंदुत्वाचा विजय आहे. माझे जीवन आता अर्थपूर्ण झाले आहे."

प्रज्ञा यांच्याविरुद्ध काय पुरावे होते?प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध एनआयएने न्यायालयाला सांगितले की, मशिदीबाहेर ज्या बाईकमध्ये स्फोट झाला ती तिच्या नावावर होती. एनआयएने म्हटले आहे की, या बाईकवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. त्यासोबतच चेसिस नंबर आणि इंजिन नंबरही खोडून काढण्यात आला होता. एनआयएने या गाडीला प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा म्हटले होते. त्यामुळेच प्रज्ञा यांना संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले.

एनआयए वाहनाची ओळखही सिद्ध करू शकले नाही!या संपूर्ण प्रकरणाबाबत, एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, सरकारी वकिलांनी बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध केले. तथापि, ते हे सिद्ध करू शकले नाहीत की बॉम्ब गाडीतच ठेवला होता. यासोबतच न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, बाईकचा चेसिस नंबरही सापडला नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर त्या बाईकच्या मालक होत्या हे सिद्ध होऊ शकले नाही.

प्रज्ञा ठाकूर यांना निर्दोष सोडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बाईकचा चेसिस क्रमांक ना सापडणं. न्यायालयाने म्हटले की, केवळ बोलण्याने काही होत नाही, एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे देखील असले पाहिजेत. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यांना बाईकमध्ये ठेवलेल्या बॉम्बबद्दल सांगितले होते असे म्हटले होते, मात्र हे देखील सिद्ध होऊ शकले नाही.

'या' लोकांना आरोपी बनवण्यात आलेभाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिलकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकरधर द्विवेदी यांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटMalegaonमालेगांवSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय