शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 08:55 IST

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे.

नवी दिल्ली : देशात रोज ५० किलोमीटरपेक्षा जास्त महामार्ग बांधणीचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘या महिन्यात महामार्ग बांधणीचा स्वत:चाच जागतिक विक्रम सरकार मागे टाकेल.’

मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे नुकत्याच ५ राज्यांत झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला लाभ झाल्याचे दिसले, असे गडकरी म्हणाले. मंत्रालयाने रोज ३८ किलोमीटर महामार्ग बांधणीच्या विक्रमासह आधीच ३ विक्रम स्थापन केलेले आहेत, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, ‘आता आम्हाला रोज ५० किलोमीटर महामार्ग बांधणी करण्याची इच्छा आहे. मार्च, २०२२ अखेरपर्यंत मागच्या वर्षीच्या विक्रमाला मागे टाकायचे आहे.

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे.’ भारतात लवकरच ग्रीन हायड्रोजन कार धावणार असून स्वयंचलित वाहनांचे उत्पादक सहा महिन्यांत देशातील गरजांच्या पूर्ततेसाठी फ्लेक्झिबल फ्युएल वाहने निर्मिती करण्यास बांधील आहेत, असेही गडकरी म्हणाले.

यापूर्वी भारतीय राजकारणावर जात, गुन्हेगार आणि रोख यांचा प्रभाव होता; परंतु या निवडणुकीने हे दाखवून दिले की लोक विकासासाठी मत देत आहेत. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांनी ६ महिन्यांत आवश्यक ते बदल आम्ही करून घेऊ, असे आश्वासन मला दिले आहे.-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते  वाहतूक आणि महामार्गमंत्री

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकCentral Governmentकेंद्र सरकार