शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

केंद्र सरकारने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला! देशातील तब्बल ७२.२९ टक्के घरांमध्ये आता थेट येतेय नळाद्वारे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 09:07 IST

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ...

नवी दिल्ली : भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत देशातील फक्त १६.८१ टक्के गावांमध्ये त्यांच्या घरात नळाचे पाणी होते, ज्याचे प्रमाण आता २५ डिसेंबर २०२३ पर्यंत ७२.२९ टक्के झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील सुमारे २८ टक्के घरे अजूनही ‘नळाच्या पाण्या’च्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ५.३३ कोटी घरांना ‘नळाच्या पाण्या’ची जोडणी मिळालेली नाही. राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये या संदर्भात परिस्थिती अधिक वाईट आहे. 

ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९,२५,१७,०१५ (१९.२५ कोटी) आहे. यातील १३,९१,७०,५१६ (१३.९१ कोटी) घरांमध्ये नळाची जोडणी बसवण्यात आली आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने आरटीआय कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

सरकारने राज्य सरकारांना दिले कोट्यवधी रुपये- भारत सरकारने २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक खेड्यातील घरांना नळाचे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी ‘हर घर जल’ योजना राज्यांच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे. nमंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार, पिण्याचे पाणी हा राज्याचा विषय आहे आणि पेयजल पुरवठा योजनांचे नियोजन, रचना, मान्यता आणि अंमलबजावणी यासाठी राज्यांवर जबाबदारी आहे. भारत सरकारने या प्रयत्नात राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देऊन पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारWomenमहिलाWaterपाणी