शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली विनंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 20:57 IST

Central Government : न्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारे दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारे दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, अशी विनंती केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, अशा प्रकारे अयोग्य ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे संसदेच्या अधिकार क्षेत्रात येतो, असा दावाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

या संदर्भात केंद्र सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे की, प्रस्तुत याचिकेमधून करण्यात आलेली मागणी ही कायदा नव्याने लिहिण्यास सांगण्यासारखी किंवा संसदेला एक विशिष्ट्य पद्धतीचा कायदा तयार करण्याचे आदेश देण्यासारखी आहे. ही बाब न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहे. आता आजीवन बंदी घालणं योग्य ठरेल की नाही, ही बाब पूर्णपणे संसदेच्या अधिकार क्षेत्रात येणारी आहे.

केंद्र सरकारने या शपथपत्रात म्हटले आहे की, दंडात्मक कारवाई आणि दंडाला योग्य कालावधीपर्यंत मर्यादित ठेवल्याने सुधारणा सुनिश्चित करता येतात. तसेच अकारण होणाऱ्या सक्तीपासून वाचता येते. दंडाच्या प्रभावाला वेळेच्या आधारावर मर्यादित करणं ही काही बेकायदेशीर बाब नाही. तर दंड हा वेळेच्या आधारावर किंवा परिणामांच्या आधारावर मर्यादित असतो, हा कायद्याचा स्थापित सिद्धांत आहे, असेही केंद्राने शपथपत्रात पुढे म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार