शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 06:09 IST

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात नवतपामुळे अनेक जिल्ह्यात पारा ४० च्या पुढे गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आकाशातून अक्षरशः आग ओकणाऱ्या सूर्याने मंगळवारी राजधानी दिल्लीत ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. तीव्र उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या दिल्लीत आज नरेला आणि मुंगेशपूर भागात ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे दिल्लीतील तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल ९ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तर व मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राजस्थानच्या चुरू व हरयाणातील सिरसामध्ये पारा ५० च्या पुढे गेला. दुसरीकडे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात नवतपामुळे अनेक जिल्ह्यात पारा ४० च्या पुढे गेला आहे.

दिल्लीत सोमवारी याच भागात ४८.८ अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम नोंदविला गेला होता, पण २४ तासांच्या आतच तो मोडीत निघाला. मुंगेशपूर आणि नरेला येथे प्रत्येकी ४९.९ अंश, नजफगढ येथे ४९.८ अंश, जाफराबाद येथे ४८.६ अंश पितमपुरा आणि पुसा येथे ४८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राजधानीत अन्य भागांमध्येही तापमान ४५ ते ४७ अंशांदरम्यान नोंदविले गेले. 

केरळमध्ये जोरदार पाऊस

केरळच्या अनेक भागात मंगळवारी जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस झाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोचीतील रस्ते पाण्याखाली गेले. कोल्लम, कोट्टायम आणि एर्नाकुलम या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांना संततधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला. 

काॅंक्रिटीकरणामुळे रात्रीही वाढला असह्य उकाडा

नवी दिल्ली :  सिमेंटचे रस्ते तसेच बेसुमार कॉंक्रिटीकरणामुळे व वाढत्या नागरीकरणामुळे देशातील सुमारे १४० शहरांमध्ये रात्रीच्या वेळी ६० टक्के जास्त उकाडा जाणवत असल्याचे आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. शहरांत सिमेंटचे रस्ते  दिवसभर तापतात आणि सायंकाळनंतर त्यातून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे रात्री उकाडा जाणवत असल्याचे म्हटले आहे.

ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तापमानवाढ

  • शहरांतील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.५३ अंश सेल्सिअस
  • ग्रामीण भागातील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.२६ अंश सेल्सिअस
टॅग्स :delhiदिल्लीVidarbhaविदर्भHaryanaहरयाणाRajasthanराजस्थान