शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"इंग्रज म्हणायचे, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजींची भीती त्यांना होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:58 IST

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं.

केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव सांगितला. नेताजींचं देशप्रेम सांगताना इंग्रजांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या भितीची आठवणही करुन दिली. युवत्सव २०२३ या कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना नेताजींच्या बलिदानाची महती सांगितली. नेताजींनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यांची लढाई लढण्यासाठी आपली प्रशासकीय सेवेतील आयएएससारखी आयसीएसची नोकरी सोडून दिली होती. 

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांचा विरोध करत ते एकटे उभे राहिले होते. इंग्रज म्हणायचे की, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अनेक इंग्रज घाबरत होते. बंगालच्या धरतीवरून खुदीराम बोस यांनीही स्वातंत्र्याचा लढा दिला, येथील भूमीने अनेक स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले, म्हणूनच इंग्रजांनाही दिल्लीला जावे लागले, असा इतिहासही ठाकूर यांनी सांगितला. सध्या ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

देशात सध्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांविरुद्ध युवकांनी लढा दिला पाहिजे. तरुणाईने पुढे येऊन अशा लोकांचा विरोध केला पाहिजे, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले. दरम्यान, देशात आज सुभाष चंद्र बोस यांची १२६ वी जयंती साजरी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचा योगदान महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला.  

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसMahatma Gandhiमहात्मा गांधी