शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"इंग्रज म्हणायचे, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजींची भीती त्यांना होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:58 IST

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं.

केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव सांगितला. नेताजींचं देशप्रेम सांगताना इंग्रजांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या भितीची आठवणही करुन दिली. युवत्सव २०२३ या कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना नेताजींच्या बलिदानाची महती सांगितली. नेताजींनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यांची लढाई लढण्यासाठी आपली प्रशासकीय सेवेतील आयएएससारखी आयसीएसची नोकरी सोडून दिली होती. 

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची नोकरी सोडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांचा विरोध करत ते एकटे उभे राहिले होते. इंग्रज म्हणायचे की, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही, पण नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अनेक इंग्रज घाबरत होते. बंगालच्या धरतीवरून खुदीराम बोस यांनीही स्वातंत्र्याचा लढा दिला, येथील भूमीने अनेक स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले, म्हणूनच इंग्रजांनाही दिल्लीला जावे लागले, असा इतिहासही ठाकूर यांनी सांगितला. सध्या ठाकूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

देशात सध्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांविरुद्ध युवकांनी लढा दिला पाहिजे. तरुणाईने पुढे येऊन अशा लोकांचा विरोध केला पाहिजे, असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले. दरम्यान, देशात आज सुभाष चंद्र बोस यांची १२६ वी जयंती साजरी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचा योगदान महत्त्वाचं आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला.  

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसMahatma Gandhiमहात्मा गांधी