शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करणार; तक्रारीला विलंब नाही, SBI चं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:23 IST

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही.

नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, आम्ही शक्य तितकी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू, असे एसबीआयने म्हटले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली २ डझनहून अधिक लोकांना कन्सोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्येच कंपनीचे खाते एनपीए झाले. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश आले नाही, असे एसबीआयने म्हटले.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला अन्य बँकांकडून तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले. सर्वात पहिली तक्रार नोव्हेंबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आली होती. २०२१ मध्ये एक सर्वसमावेशक तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये बँकांकडून कोणताही उशीर झालेला नाही. शिपयार्ड २०१३ पासून तोट्यात आहे, असे बँकेने म्हटले आहे.

मोदींच्या कार्यकाळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक : राहुल गांधी

एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून सर्व बाजूंनी सरकारवर टीका होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया