शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:44 IST

Indian Railway: माकडांच्या टोळक्याने जंगलात रेल्वेगाडीचा खोळंबा केल्याची अजब घटना समोर आली आहे. माकडांमुळे वांद्रे (मुंबई) येथून बरौनी येथे जात असलेली अवध एक्स्प्रेस जंगलात अडकली.

पाटणा - आपल्या आसपास वावरणाऱ्या माकडांच्या टोळ्यांच्या मर्कटलीला तुम्ही पाहिल्या असतील. मात्र या माकडांच्या टोळक्याने जंगलात रेल्वेगाडीचा खोळंबा केल्याची अजब घटना समोर आली आहे. माकडांमुळे वांद्रे (मुंबई) येथून बरौनी येथे जात असलेली अवध एक्स्प्रेस जंगलात अडकली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार माकडांचे एक टोळक्याने रेल्वेच्या हायटेन्शन तारेवर उड्या मारायला सुरुवात केली. त्यामुळे तार तुटली. तार तुटल्याने रेल्वेचं दळणवळण ठप्प झालं. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. खूप प्रयत्नानंतर ही वायर दुरुस्त झाली. त्यानंतर दोन तासांनी अवध एक्सप्रेस रवाना झाली. हायटेन्शन वायर तुटल्याने गोरखपूर-नरकटियागंज रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूर-नरकटियागंज रेल्वेमार्गावर वाल्मिकीनगर रेल्वेस्टेशनजवळ पोल क्रमांक ३१९/१ च्या जवळ हायटेन्शन वायरच्या संपर्कात माकड आल्याने तारमध्ये लागलेला इन्सुलेटर तुटून रेल्वेट्रॅकवर पडला. त्यामुळे ट्रेनची वाहतून पूर्णपणे ठप्प झाली. याची माहिती वाल्मिकीनगर पोलीस ठाणे,आणि पनियहवा स्टेशन मास्तर आणि समस्तीपूर कंट्रोल रूमला देण्यात आली.

हायटेन्शन वायर तुटल्याने बांद्रा येथून बरौनी येथे जाणाऱ्या अवध एक्स्प्रेस व्हीटीआरच्या जंगलात खोळंबून राहिली. या रेल्वेमार्गावर चालणाऱ्या सप्तक्रांती एक्स्प्रेससह अनेक ट्रेन विविध स्थानकांवर रोखावे लागले.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेBiharबिहार