शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:35 IST

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ साली दंगे झाले, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही. मात्र, या दंग्यांच्या निमित्ताने गुजरात सरकारविरोधात राजकीय हेतूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधील निष्कर्ष मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अनेक खोटेनाटे पुरावे मोदी, गुजरात सरकारविरोधात उभे करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्या निर्णयानंतर अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेली जातीय दंगल पूर्वनियोजित होती, त्यात गुजरात सरकार, नरेंद्र मोदी यांचा हात होता, असे खोटेनाटे आरोप झाले होते. ते म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले आहेत. काँग्रेस व भाजप सरकारच्या कोणत्याही पाच वर्षांच्या कार्यकाळाची तुलना करून बघा, सर्वाधिक दंगे कोणत्या पक्षाच्या राजवटीत झाले आहेत, याचा नीट उलगडा होईल. गुजरातमधील दंगलींचे मूळ कारण रेल्वेगाडी पेटवून देण्याच्या एका घटनेत होते. त्या हत्याकांडात ६० लोकांना व आपल्या आईच्या कुशीत बसलेल्या १६ दिवसांच्या अर्भकालाही निर्घृण पद्धतीने जिवंत जाळण्यात आले होते. त्या घटनेत मरण पावलेल्यांपैकी काही जणांचे मी स्वत: अंत्यसंस्कार केले होते. गोध्रा हत्याकांडाचा सर्वात प्रथम भाजपने निषेध केला होता. विरोधी पक्ष मूग गिळून गप्प होते. 

‘शीख विरोधी दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी आम्ही स्थापन केली’केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, दिल्लीमध्ये शीखांच्या विरोधात दंगल झाली. त्यावेळी तीन दिवस ही दंगल रोखण्यासाठी लष्कर किंवा कोणत्याही सुरक्षा दलाला बोलाविले नव्हते. या दंगलीची चौकशी करण्यास एकही एसआयटी स्थापन करण्यात आली नव्हती. भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर ही एसआयटी नेमण्यात आली. आम्ही आरोपींना अटक केली. 

खोटेपणाचा बुरखा फाडायलाच हवाअमित शहा म्हणाले की, गुजरात दंगलीबाबत राज्यातील तत्कालीन मोदी सरकारवर केलेल्या खोट्या आरोपांविरोधात आम्ही प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. खोटेपणाचा बुरखा फाडणे आवश्यक असते. दंगली घडविण्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याची क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने दिली. मुसलमानांच्या मताविना भाजप सरकार बनवू शकतो असा आरोप होत असतो. त्याबाबत अमित शहा म्हणाले की, देशात गुजरात मॉडेल म्हणून काही गोष्टी निश्चितच अस्तित्वात आल्या आहेत. आम्ही राज्यात २४ तास वीज सर्वांना उपलब्ध करून दिली. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे थांबविली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujaratगुजरात