शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ठाकोर समाजाच्या मुलींवर मोबाईल वापरण्यास बंदी; सापडल्यास 1.5 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 10:52 IST

ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती.

खाप पंचायत, जात पंचायतींसारखीच गुजरातच्या ठाकोर समाजाने मनमानी सुरू केली आहे. ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मानच समाजाच्या पंचायतीने सोडले आहे. 

ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती. जालोल गावात झालेल्या या पंचायतीमध्ये मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. गावातील लोक पंचायतीच्या नियमांनाच त्यांचे संविधान मानत आहेत. या पंचायतीचे लोक समाजाचे नियम बनवितात. या नव्या नियमानुसार अविवाहित मुलगीने मोबाईल बाळगणे ठाकोर समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत गुन्हा समजला जाणार आहे. 

जर समाजाच्या अविवाहित मुलीकडे मोबाईल आढळला तर तिच्या वडिलांना 1.5 लाख रुपयांचा दंड पंचायतीकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जर एखादी मुलगी कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करत असेल तर त्यालाही गुन्हा मानला जाणार आहे. जिल्हा पंचायत सदस्याने सांगितले की, पंचायतीने समाजहितामध्ये काही निर्णय घेतले आहेत. विवाहावेळचा अवास्तव खर्च रोखण्यासाठी डिजे, फटाके वाजविण्यावर बंदी आणली आहे. मोबाईल फोन बाळगणे आणि त्यावर दंड आकारण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, मात्र लागू करण्याचा निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :MobileमोबाइलGujaratगुजरात