शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, लवकरच संसदेत; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:18 IST

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ यावर खर्च किती होणार आहे, किती ईव्हीएम आणखी लावावी लागणार, त्याचे संरक्षण कसे होणार, असे विविध प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केले.

One Nation One Election: गेल्या काही वर्षांपासून देशात ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण आणण्याबाबत भाजपा प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून देशात ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. त्यानंतर आता ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केले असून, लवकरच हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक सादर करण्याचा केंद्रातील भाजपा एनडीए सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. 

‘एक देश, एक निवडणूक’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने १८ हजार पानी अहवाल तयार केला. ज्यावर २१ हजार दुरुस्त्या येऊन त्यापैकी ८० टक्के दुरुस्त्या या पद्धतीच्या बाजूने आहेत, असे सांगितले जात आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण राबवायचे असल्यास त्यासाठी संविधानात दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण पुढील लोकसभा निवडणुकीवेळी, म्हणजे २०२९ मध्ये राबविले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाष्य केले आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न?

विधेयक सादर करेपर्यंत वाट पाहणार आहोत. कशा पद्धतीने ‘एक देश, एक निवडणूक’ लागू केले जाणार आहे. त्यावर खर्च किती होणार आहे, किती ईव्हीएम मशीन आणखी लावावी लागणार आहेत, संरक्षणाची व्यवस्था कशी असणार आहे, व्हीव्हीपॅट मशीनची संख्या कमी आहे ती कशी लावली जाणार आहेत, यांसारख्या अनेक गोष्टी आहे, ज्यावर चर्चा आणि विचार करावा लागेल. संविधानात याबाबतची तरतूद कशी केली जाणार आहे, सर्व राज्यातील विधिमंडळात याबाबत काय होणार आहे, हेही पाहावे लागेल, ही एक मोठी प्रक्रिया आहे. विधेयक पटलावर आले की, याबाबत अधिक बोलू शकेन, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, झारखंड आणि महाराष्ट्राचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी लागले. तिथे मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नव्या सरकारचे काम सुरूही झाले. परंतु, दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव ठरून शपथविधी व्हायलाच अनेक दिवस गेले आणि अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप झालेले आहे. दिल्लीतून रिमोट कंट्रोल चालेल, त्यानंतर महाराष्ट्र पुढे जाईल, तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. दिलेली आश्वासने पूर्ण होतील म्हणून जनतेने कौल दिला. आता वाट पाहण्याशिवाय जनतेला कोणताही पर्याय नाही. कारण दिल्लीत हजेरी लावल्याशिवाय महाराष्ट्रातील कामे सुरू होणार नाही, अशी बोचरी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.  

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनShiv SenaशिवसेनाParliamentसंसद