शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:28 IST

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्ब भरुन लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं.

नवी दिल्ली - 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना भारताने क्षणार्धात उद्ध्वस्त केले. या भारतीय हवाई दलाच्या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दोन पायलटने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अवघ्या 90 सेकंदामध्ये त्यांनी लक्ष्य साध्य केलं.तसेच मिशनची गोपनीयता असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याची कल्पना नव्हती. 

गेल्या 48 वर्षामध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने पाकच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत बालकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली होती. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. 

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकसाठी मिराज-2000 या विमानांचा उपयोग केला होता. हिंदूस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या एका पायलटने 90 सेकंदात आपलं लक्ष्य साध्य करत दहशतवाद्यांच्या तळावर मिसाईल डागली. या ऑपरेशनची माहिती खूप कमी जणांना देण्यात आली होती. एअर स्ट्राईकच्या दिवशी जेव्हा टीव्हीवर या बातम्या येऊ लागल्या तेव्हा पायलटच्या पत्नीने तुम्ही या मिशनमध्ये होता का? असं विचारलं असता त्याला काहीच उत्तर न देता पुन्हा झोपी गेलो असं पायलटने सांगितले. 

मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दुसऱ्या पायलटने सांगितले की, आम्ही खूप साऱ्या कॉम्बेट एअर पेट्रोलसह नियंत्रण रेषेवरुन उड्डाण घेतलं. एलओसीवर एकाच वेळी कॉम्बेट एअर पेट्रोल उडविण्यामागे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेला चकमा देणं हे उद्दिष्ट होतं. एअर स्ट्राईकच्या दोन दिवस आधीपर्यंत या मिशनची माहिती कोणालाच नव्हती. आम्हाला काहीतरी होणार एवढं माहित होतं पण नक्की काय होईल याची कल्पना नव्हती असं पायलटने सांगितले. 

26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्बने लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी सुखोई 30 एमकेआय तैनात करण्यात आलं होतं. हल्ल्यानंतर फोटो घेण्यासाठी हेरोन ड्रोन सज्ज होतं. आम्ही देशाच्या पूर्वेकडून उड्डाण घेत काश्मीरला पोहचलो. तिथे पोहचल्यानंतर आम्ही रेडिओ बंद केला. आमच्या आजूबाजूला कोणतंही पाकिस्तानचं लढाऊ विमान नव्हतं हे महत्वाचं होतं. मिसाईलने आपलं काम केलं. आम्ही शत्रूंना टार्गेट केलं अशी माहिती पायलटने दिली. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी