शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 07:39 IST

पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरेश एस. डुग्गर

जम्मू : गेल्या दोन वर्षांपासून जम्मू भागामध्ये दहशतवादी अचानक हल्ले करत असून, गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. त्यांनी बदललेल्या या रणनीतीचा मुकाबला करताना लष्कराचे ५२ जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जम्मूतील सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-४ कार्बाइनचा वापर करतात.

जम्मूतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

जम्मूतील सर्व जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने तिथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत. जे दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत त्यांचाच राजौरी, पुंछ, दोडा येथील हल्ल्यांमागे हात असल्याचा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. या दहशतवाद्यांचाही लवकरच समूळ नायनाट करू, असे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शोध सुरूच

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने त्या दिशेने सुरक्षा जवानांनी गोळीबार केला.

गुरुवारी सकाळी या भागात शोध घेतला असता जवानांना तिथे संशयास्पद असे काही आढळून आले नाही. दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.

खबरे बोलेनात...

या भागात लष्कराचे खबरे होते त्यांच्याकडे काही प्रमाणात लष्कराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या खबऱ्यांकडून मिळणारी गोपनीय माहितीही आटली आहे.

nत्याचा फटका बसत आहे, असे मतही व्यक्त होत आहे. ड्रोनपेक्षा मानवी टेहळणी अधिक महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांना वाटते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर