शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 07:39 IST

पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सुरेश एस. डुग्गर

जम्मू : गेल्या दोन वर्षांपासून जम्मू भागामध्ये दहशतवादी अचानक हल्ले करत असून, गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. त्यांनी बदललेल्या या रणनीतीचा मुकाबला करताना लष्कराचे ५२ जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जम्मूतील सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-४ कार्बाइनचा वापर करतात.

जम्मूतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

जम्मूतील सर्व जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने तिथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत. जे दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत त्यांचाच राजौरी, पुंछ, दोडा येथील हल्ल्यांमागे हात असल्याचा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. या दहशतवाद्यांचाही लवकरच समूळ नायनाट करू, असे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शोध सुरूच

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने त्या दिशेने सुरक्षा जवानांनी गोळीबार केला.

गुरुवारी सकाळी या भागात शोध घेतला असता जवानांना तिथे संशयास्पद असे काही आढळून आले नाही. दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.

खबरे बोलेनात...

या भागात लष्कराचे खबरे होते त्यांच्याकडे काही प्रमाणात लष्कराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या खबऱ्यांकडून मिळणारी गोपनीय माहितीही आटली आहे.

nत्याचा फटका बसत आहे, असे मतही व्यक्त होत आहे. ड्रोनपेक्षा मानवी टेहळणी अधिक महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांना वाटते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर