शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

'त्यानं' कंदाहार विमान अपहरण केलं, भारताच्या विमानांनीच त्याला मातीत गाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 11:15 IST

इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरही ठार झाला आहे. युसूफ अझहर हा केवळ मसूदचा मेहुणाच नव्हे, तर अतिशय कुख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जात असे आणि भारतासाठी तो मोस्ट वाँटेड होता. कंदाहार विमान अपहरणात तोही सहभागी होता. बालाकोटमधील ज्या तळावर हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवला, तिथे तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी युसूफ अझहर याच्यावर होती. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते. ते विमान अपहरणकर्त्यांनी अमृतसर, लाहोर, दुबई व नंतर अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेले. हे विमान व आतील प्रवासी सात दिवस अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते.

एकूण १७६ पैकी २६ प्रवाशांना अपहरणकर्त्यांनी दुबई येथे सोडून दिले. एकाला त्यांनी भोसकले आणि अन्य काही जणांनाही मारहाण केली. या अपहरणात युसूफ अझहर सहभागी होता. त्यावेळी मसूद अझहर व अन्य दोन पाकिस्तानी दहशतवादी भारतीय तुरुंगात खितपत पडले होते. त्यांना सोडून द्यावे, अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. अखेर भारताने मसूद अझहर तसेच मुश्ताक अहमद झरगार व अहमद ओमर सईद शेख यांना सोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह त्या तिघांना घेऊन विमानाने कंदाहारला गेले होते. त्या तिघांचा ताबा दिल्यानंतरच अपहरणकर्त्यांनी विमानाचा ३१ डिसेंबर १९९९ रोजी ताबा सोडला. त्याआधी अपहरणकर्त्या दहशतवाद्यांशी वाटाघाटी करीत होते अजित डोवाल. तेव्हा ते इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते.

सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तेव्हापासून मसूद अझहरच्या कारवाया वाढल्या. त्याच्या सर्व कृत्यात त्याचा मेहुणा युसूफ अझहरही सहभागी असे. हवाई दलाने केलेल्या कारवाईच्या आधीच पाकिस्तानने मसूद अझहरला तेथून हलवले होते. तो सध्या बहावलपूर येथे असल्याचे सांगण्यात येते. तो नाही, तरी त्याचा मेहुणा युसूफ मात्र ठार झाला आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकmasood azharमसूद अजहर