शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

'त्यानं' कंदाहार विमान अपहरण केलं, भारताच्या विमानांनीच त्याला मातीत गाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 11:15 IST

इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरही ठार झाला आहे. युसूफ अझहर हा केवळ मसूदचा मेहुणाच नव्हे, तर अतिशय कुख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जात असे आणि भारतासाठी तो मोस्ट वाँटेड होता. कंदाहार विमान अपहरणात तोही सहभागी होता. बालाकोटमधील ज्या तळावर हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवला, तिथे तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी युसूफ अझहर याच्यावर होती. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते. ते विमान अपहरणकर्त्यांनी अमृतसर, लाहोर, दुबई व नंतर अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेले. हे विमान व आतील प्रवासी सात दिवस अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते.

एकूण १७६ पैकी २६ प्रवाशांना अपहरणकर्त्यांनी दुबई येथे सोडून दिले. एकाला त्यांनी भोसकले आणि अन्य काही जणांनाही मारहाण केली. या अपहरणात युसूफ अझहर सहभागी होता. त्यावेळी मसूद अझहर व अन्य दोन पाकिस्तानी दहशतवादी भारतीय तुरुंगात खितपत पडले होते. त्यांना सोडून द्यावे, अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. अखेर भारताने मसूद अझहर तसेच मुश्ताक अहमद झरगार व अहमद ओमर सईद शेख यांना सोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह त्या तिघांना घेऊन विमानाने कंदाहारला गेले होते. त्या तिघांचा ताबा दिल्यानंतरच अपहरणकर्त्यांनी विमानाचा ३१ डिसेंबर १९९९ रोजी ताबा सोडला. त्याआधी अपहरणकर्त्या दहशतवाद्यांशी वाटाघाटी करीत होते अजित डोवाल. तेव्हा ते इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते.

सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तेव्हापासून मसूद अझहरच्या कारवाया वाढल्या. त्याच्या सर्व कृत्यात त्याचा मेहुणा युसूफ अझहरही सहभागी असे. हवाई दलाने केलेल्या कारवाईच्या आधीच पाकिस्तानने मसूद अझहरला तेथून हलवले होते. तो सध्या बहावलपूर येथे असल्याचे सांगण्यात येते. तो नाही, तरी त्याचा मेहुणा युसूफ मात्र ठार झाला आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकmasood azharमसूद अजहर