शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांनी दिली होती ठार मारण्याची धमकी

By admin | Updated: January 5, 2016 23:35 IST

‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.

पठाणकोट : ‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.’ ही आपबिती आहे पठाणकोट हवाईदल तळावर हल्ला करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडलेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची. हल्लेखोर दहशतवाद्यांनी सिंह यांचे वाहन बळजबरीने हिसकावून नेले होते. हल्ल्यानंतर मंगळवारी प्रथमच सलविंदरसिंग यांनी अपहरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. एके ४७ रायफलधारी दहशतवाद्यांना सुरुवातीला मी एक पोलीस अधिकारी असल्याची कल्पना नव्हती. परंतु माझ्या अंगरक्षकाचा फोन आला तेव्हा दहशतवाद्यांनीच तो घेतला. त्यानंतर त्यांना आपण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पकडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि माझे तीन मोबाईल तसेच गाडी घेऊन फरार झाले, असे सिंग यांनी सांगितले. दहशतवादी मला ठार मारण्यासाठी परत आले होते. परंतु तोपर्यंत मी आपले हात सोडून घटनास्थळावरून निघून गेलो होतो, असा दावाही त्यांनी केला. आपण साधा पोषाख का केला होता आणि आपला अंगरक्षक सोबत का नव्हता? असा प्रश्न विचारला असता पोलीस अधीक्षक म्हणाले, मी पीरबाबाच्या प्रार्थनेला गेलो होतो. त्यामुळे गणवेश घातला नव्हता आणि सुरक्षाजवानास सोबत नेले नव्हते. दहशतवादी उर्दु, पंजाबी आणि हिंदी भाषेत बोलत होते. परंतु अंधार असल्याने त्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही. चार ते पाच दहशतवादी होते असा अंदाज आहे. सलविंदरसिंग हे त्यांचे मित्र राजेश वर्मा आणि स्वयंपाकी मदन गोपाल यांच्यासोबत गुरुवारी रात्री प्रार्थना करून परतत असताना दहशतवाद्यांनी मार्गात त्यांचे वाहन अडविले होते. सर्व दहशतवादी एके ४७ रायफली आणि जीपीएसने सज्ज होते. सुरुवातीला पोलीस अधीक्षक व स्वयंपाक्यास गाडीतून खाली फेकण्यात आले होते. परंतु राजेश यांना ओलीस ठेवून त्यांच्यावर हल्ला केला होता. आपण दहशतवाद्यांना विरोध का केला नाही? या प्रश्नाला उत्तर देताना सिंग म्हणाले, सशस्त्र दहशतवाद्यांपुढे मी काय करू शकणार होतो. परंतु घटनेनंतर मी लगेच वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस महासंचालक, सहायक पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी पठाणकोटमध्ये डेरेदाखल झाले. माझ्याकडे जी माहिती होती ती मी तात्काळ आणि योग्य पद्धतीने दिली, असा दावा या अधिकाऱ्याने केला. (वृत्तसंस्था)अपहृत जखमी वर्मा यांची माहिती ‘ते सतत कमांडर साहिबच्या संपर्कात होते’1 अपहरणकर्ते दहशतवादी सतत आपल्या ‘कमांडर साहिब’च्या संपर्कात होते आणि दर दहा मिनिटांनी त्याला फोन करीत होते, अशी माहिती एसपी सलविंदरसिंग यांचे सराफा व्यापारी मित्र राजेश वर्मा यांनी दिली. राजेश चार तासांच्या वर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. यावेळी दहशतवाद्यांनी राजेश यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 ‘संपूर्ण परिसरात शांतता असून आम्ही सहजपणे आमच्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकतो, ’,अशी खात्री या दहशतवाद्यांनी त्यांच्या म्होरक्याशी बोलताना व्यक्त केली होती. ‘हमारा काम इंशाअल्ला फतेह हो जायेगा’ असे ते म्हणाले होते.3 एसपींच्या गाडीत चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ‘मेजर साहिब’ होती आणि तो ‘कमांडर साहिब’शी सतत फोनवर बोलत होता. इतर दहशतवादी फारसे बोलत नव्हते आणि बोलले तरी उर्दुतून बोलायचे त्यामुळे ‘इंशाअल्ला’वगळता त्यांचे इतर बोलणे मला कळले नाही, असे वर्मा यांनी सांगितले. 4 दहशतवाद्यांनी जीपीएसचा वापर केला काय? असे विचारले असता वर्मा यांनी सांगितले की, एकदा ते आपल्या मार्गावरून भरकटले होते. मार्ग चुकला असल्याचे वाहनचालकाने लक्षात आणून दिले तेव्हा त्यांनी आपला जीपीएस सुरू केला होता आणि आम्ही नदीजवळ पोहोचलो असल्याने रस्ता बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले होते. 5 वर्मा यांच्या सांगण्यानुसार ते रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळील २,००० रुपयेही हिसकावून घेतले होते. वर्मा यांच्या वॉलेटमध्ये आणखीही पैसे होते. पण त्यांनी सर्व पैसे घेतले नाहीत. सर्वांजवळ बॅकपॅक्स होत्या आणि त्या चांगल्याच जड असाव्यात. दहशतवादी पाच मोबाईलचा वापर करीत होते. 6 आपल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गळा कापून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी थांबल्यावर दोघे जण वाहनातून खाली उतरले आणि माझ्या पायावर बसलेल्या ‘अल्फा’ला त्यांनी मला मारण्याचा आदेश दिला. त्याक्षणी आता आपण संपलो याची जाणीव मला झाली होती.7 दहशतवादी पुढे निघून गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आपले बांधलेले पाय सोडवून घेतले. तब्बल अर्धा तास धावल्यानंतर त्यांना एक गुरुद्वारा दिसला. तेथे वर्मा यांनी आश्रय घेतला. एसपींचा अंगरक्षक आणि दहशतवाद्यांदरम्यानचे बोलणे आपण ऐकले काय? असे विचारले असता होकारार्थी उत्तर देत ते म्हणाले, कुलविंदरचा फोन आला होता आणि तो एसपी साहीब कुठे आहेत? अशी विचारणा करीत असल्याचे मी ऐकले होते, असे वर्मा यांनी सांगितले.