शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दहशतवाद्यांनी दिली होती ठार मारण्याची धमकी

By admin | Updated: January 5, 2016 23:35 IST

‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.

पठाणकोट : ‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.’ ही आपबिती आहे पठाणकोट हवाईदल तळावर हल्ला करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडलेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची. हल्लेखोर दहशतवाद्यांनी सिंह यांचे वाहन बळजबरीने हिसकावून नेले होते. हल्ल्यानंतर मंगळवारी प्रथमच सलविंदरसिंग यांनी अपहरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. एके ४७ रायफलधारी दहशतवाद्यांना सुरुवातीला मी एक पोलीस अधिकारी असल्याची कल्पना नव्हती. परंतु माझ्या अंगरक्षकाचा फोन आला तेव्हा दहशतवाद्यांनीच तो घेतला. त्यानंतर त्यांना आपण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पकडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि माझे तीन मोबाईल तसेच गाडी घेऊन फरार झाले, असे सिंग यांनी सांगितले. दहशतवादी मला ठार मारण्यासाठी परत आले होते. परंतु तोपर्यंत मी आपले हात सोडून घटनास्थळावरून निघून गेलो होतो, असा दावाही त्यांनी केला. आपण साधा पोषाख का केला होता आणि आपला अंगरक्षक सोबत का नव्हता? असा प्रश्न विचारला असता पोलीस अधीक्षक म्हणाले, मी पीरबाबाच्या प्रार्थनेला गेलो होतो. त्यामुळे गणवेश घातला नव्हता आणि सुरक्षाजवानास सोबत नेले नव्हते. दहशतवादी उर्दु, पंजाबी आणि हिंदी भाषेत बोलत होते. परंतु अंधार असल्याने त्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही. चार ते पाच दहशतवादी होते असा अंदाज आहे. सलविंदरसिंग हे त्यांचे मित्र राजेश वर्मा आणि स्वयंपाकी मदन गोपाल यांच्यासोबत गुरुवारी रात्री प्रार्थना करून परतत असताना दहशतवाद्यांनी मार्गात त्यांचे वाहन अडविले होते. सर्व दहशतवादी एके ४७ रायफली आणि जीपीएसने सज्ज होते. सुरुवातीला पोलीस अधीक्षक व स्वयंपाक्यास गाडीतून खाली फेकण्यात आले होते. परंतु राजेश यांना ओलीस ठेवून त्यांच्यावर हल्ला केला होता. आपण दहशतवाद्यांना विरोध का केला नाही? या प्रश्नाला उत्तर देताना सिंग म्हणाले, सशस्त्र दहशतवाद्यांपुढे मी काय करू शकणार होतो. परंतु घटनेनंतर मी लगेच वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस महासंचालक, सहायक पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी पठाणकोटमध्ये डेरेदाखल झाले. माझ्याकडे जी माहिती होती ती मी तात्काळ आणि योग्य पद्धतीने दिली, असा दावा या अधिकाऱ्याने केला. (वृत्तसंस्था)अपहृत जखमी वर्मा यांची माहिती ‘ते सतत कमांडर साहिबच्या संपर्कात होते’1 अपहरणकर्ते दहशतवादी सतत आपल्या ‘कमांडर साहिब’च्या संपर्कात होते आणि दर दहा मिनिटांनी त्याला फोन करीत होते, अशी माहिती एसपी सलविंदरसिंग यांचे सराफा व्यापारी मित्र राजेश वर्मा यांनी दिली. राजेश चार तासांच्या वर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. यावेळी दहशतवाद्यांनी राजेश यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 ‘संपूर्ण परिसरात शांतता असून आम्ही सहजपणे आमच्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकतो, ’,अशी खात्री या दहशतवाद्यांनी त्यांच्या म्होरक्याशी बोलताना व्यक्त केली होती. ‘हमारा काम इंशाअल्ला फतेह हो जायेगा’ असे ते म्हणाले होते.3 एसपींच्या गाडीत चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ‘मेजर साहिब’ होती आणि तो ‘कमांडर साहिब’शी सतत फोनवर बोलत होता. इतर दहशतवादी फारसे बोलत नव्हते आणि बोलले तरी उर्दुतून बोलायचे त्यामुळे ‘इंशाअल्ला’वगळता त्यांचे इतर बोलणे मला कळले नाही, असे वर्मा यांनी सांगितले. 4 दहशतवाद्यांनी जीपीएसचा वापर केला काय? असे विचारले असता वर्मा यांनी सांगितले की, एकदा ते आपल्या मार्गावरून भरकटले होते. मार्ग चुकला असल्याचे वाहनचालकाने लक्षात आणून दिले तेव्हा त्यांनी आपला जीपीएस सुरू केला होता आणि आम्ही नदीजवळ पोहोचलो असल्याने रस्ता बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले होते. 5 वर्मा यांच्या सांगण्यानुसार ते रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळील २,००० रुपयेही हिसकावून घेतले होते. वर्मा यांच्या वॉलेटमध्ये आणखीही पैसे होते. पण त्यांनी सर्व पैसे घेतले नाहीत. सर्वांजवळ बॅकपॅक्स होत्या आणि त्या चांगल्याच जड असाव्यात. दहशतवादी पाच मोबाईलचा वापर करीत होते. 6 आपल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गळा कापून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी थांबल्यावर दोघे जण वाहनातून खाली उतरले आणि माझ्या पायावर बसलेल्या ‘अल्फा’ला त्यांनी मला मारण्याचा आदेश दिला. त्याक्षणी आता आपण संपलो याची जाणीव मला झाली होती.7 दहशतवादी पुढे निघून गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आपले बांधलेले पाय सोडवून घेतले. तब्बल अर्धा तास धावल्यानंतर त्यांना एक गुरुद्वारा दिसला. तेथे वर्मा यांनी आश्रय घेतला. एसपींचा अंगरक्षक आणि दहशतवाद्यांदरम्यानचे बोलणे आपण ऐकले काय? असे विचारले असता होकारार्थी उत्तर देत ते म्हणाले, कुलविंदरचा फोन आला होता आणि तो एसपी साहीब कुठे आहेत? अशी विचारणा करीत असल्याचे मी ऐकले होते, असे वर्मा यांनी सांगितले.