शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटल्यानंतर काश्मीरचे नागरिकत्व मिळवणाऱ्या पंजाबी ज्वेलरची दहशतवाद्यांकडून हत्या

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 08:47 IST

Terror Attack in Srinagar : कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी केली हत्या ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये निर्माण झाले दहशतीचे वातावरण नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते

श्रीनगर - कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतपाल निश्चल हे काश्मीरमध्ये निवासी प्रमाणपत्र घेणारे पहिले व्यक्ती होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, निश्चल सरायबाला येथे सुमारे १७ वर्षे भाडेकरू म्हणून राहत होते. मात्र निश्चल यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर प्रगती केली आणि श्रीनगरमधील आलिशान अशा इंदिरानगर परिसरात घर घेतले होते. ते तिथे २५ वर्षांपासून राहत होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते. निश्चल यांनी नवा भूमि कायदा अस्तित्वात आल्यानंतर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तयार करण्याचा निर्णय घेतला होता.सूत्रांच्या म्हणण्यानुसार सतपाल निश्चल यांनी घेतलेले डोमिसाइल सर्टिफिकेट हेच त्यांच्या हत्येचे कारण ठरले आहे. काश्मीरच्या बाहेरली लोकांनी जर येथील निवासी प्रमाणपत्र घेणयाचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल, असे सांगण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी या हत्येच्या माध्यमातून केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार निश्चल यांची हत्या ही दहशतवादी हल्ल्यात झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र निश्चल यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही हत्या बाहेरील लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे अनेक लोकांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाArticle 370कलम 370