शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कलम ३७० हटल्यानंतर काश्मीरचे नागरिकत्व मिळवणाऱ्या पंजाबी ज्वेलरची दहशतवाद्यांकडून हत्या

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 08:47 IST

Terror Attack in Srinagar : कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी केली हत्या ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये निर्माण झाले दहशतीचे वातावरण नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते

श्रीनगर - कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतपाल निश्चल हे काश्मीरमध्ये निवासी प्रमाणपत्र घेणारे पहिले व्यक्ती होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, निश्चल सरायबाला येथे सुमारे १७ वर्षे भाडेकरू म्हणून राहत होते. मात्र निश्चल यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर प्रगती केली आणि श्रीनगरमधील आलिशान अशा इंदिरानगर परिसरात घर घेतले होते. ते तिथे २५ वर्षांपासून राहत होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते. निश्चल यांनी नवा भूमि कायदा अस्तित्वात आल्यानंतर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तयार करण्याचा निर्णय घेतला होता.सूत्रांच्या म्हणण्यानुसार सतपाल निश्चल यांनी घेतलेले डोमिसाइल सर्टिफिकेट हेच त्यांच्या हत्येचे कारण ठरले आहे. काश्मीरच्या बाहेरली लोकांनी जर येथील निवासी प्रमाणपत्र घेणयाचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल, असे सांगण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी या हत्येच्या माध्यमातून केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार निश्चल यांची हत्या ही दहशतवादी हल्ल्यात झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र निश्चल यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही हत्या बाहेरील लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे अनेक लोकांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाArticle 370कलम 370