शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:37 IST

अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३३ देशांमध्ये पाठवण्यात आली असून, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा त्यात समावेश आहे. अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

झकीउर रहमान लखवी प्रकरणावरून पाकिस्तानचा पर्दाफाश

ओवेसींनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत पाकिस्तानवर दुटप्पीपणा दाखवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखालील व्यक्तीला तुरुंगात सजा भोगत असताना विशेष वागणूक देत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये लखवी तुरुंगात असूनही बाप बनतो, हे कायद्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही का?”

ग्रे लिस्टचा प्रभाव आणि ओवेसींचा इशारा

पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडताना ओवेसी म्हणाले की, “२०१८ साली जेव्हा पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, तेव्हा भारतात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. पुन्हा तसेच केल्यास परिणामकारक फरक पडेल.”

त्यांनी दहशतवादाच्या जागतिक स्वरूपावर भाष्य करत सांगितले की, “हा केवळ दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”

दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून

दहशतवादाच्या मुळाशी जात ओवेसी म्हणाले, “दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून असतो – विचारसरणी आणि निधी. पाकिस्तानी दहशतवादी गटांची विचारसरणी दाएश आणि अल-कायदाशी मिळतीजुळती आहे. त्यांना वाटते की त्यांच्या हिंसक कृत्यांना धार्मिक आधार आहे, जे पूर्णतः चुकीचे आहे.”

ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना बसला फटका

७ मे २०२५ रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व गोळीबाराच्या माध्यमातून प्रहार केला, मात्र भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत प्रभावी प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान