शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
2
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
3
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
4
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
5
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
6
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
7
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
8
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
9
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
10
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
11
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
12
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
13
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
14
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
15
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
16
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
17
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
18
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
19
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
20
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:37 IST

अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३३ देशांमध्ये पाठवण्यात आली असून, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा त्यात समावेश आहे. अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

झकीउर रहमान लखवी प्रकरणावरून पाकिस्तानचा पर्दाफाश

ओवेसींनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत पाकिस्तानवर दुटप्पीपणा दाखवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखालील व्यक्तीला तुरुंगात सजा भोगत असताना विशेष वागणूक देत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये लखवी तुरुंगात असूनही बाप बनतो, हे कायद्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही का?”

ग्रे लिस्टचा प्रभाव आणि ओवेसींचा इशारा

पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडताना ओवेसी म्हणाले की, “२०१८ साली जेव्हा पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, तेव्हा भारतात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. पुन्हा तसेच केल्यास परिणामकारक फरक पडेल.”

त्यांनी दहशतवादाच्या जागतिक स्वरूपावर भाष्य करत सांगितले की, “हा केवळ दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”

दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून

दहशतवादाच्या मुळाशी जात ओवेसी म्हणाले, “दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून असतो – विचारसरणी आणि निधी. पाकिस्तानी दहशतवादी गटांची विचारसरणी दाएश आणि अल-कायदाशी मिळतीजुळती आहे. त्यांना वाटते की त्यांच्या हिंसक कृत्यांना धार्मिक आधार आहे, जे पूर्णतः चुकीचे आहे.”

ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना बसला फटका

७ मे २०२५ रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व गोळीबाराच्या माध्यमातून प्रहार केला, मात्र भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत प्रभावी प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान