शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:37 IST

अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३३ देशांमध्ये पाठवण्यात आली असून, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा त्यात समावेश आहे. अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

झकीउर रहमान लखवी प्रकरणावरून पाकिस्तानचा पर्दाफाश

ओवेसींनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत पाकिस्तानवर दुटप्पीपणा दाखवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखालील व्यक्तीला तुरुंगात सजा भोगत असताना विशेष वागणूक देत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये लखवी तुरुंगात असूनही बाप बनतो, हे कायद्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही का?”

ग्रे लिस्टचा प्रभाव आणि ओवेसींचा इशारा

पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडताना ओवेसी म्हणाले की, “२०१८ साली जेव्हा पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, तेव्हा भारतात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. पुन्हा तसेच केल्यास परिणामकारक फरक पडेल.”

त्यांनी दहशतवादाच्या जागतिक स्वरूपावर भाष्य करत सांगितले की, “हा केवळ दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”

दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून

दहशतवादाच्या मुळाशी जात ओवेसी म्हणाले, “दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून असतो – विचारसरणी आणि निधी. पाकिस्तानी दहशतवादी गटांची विचारसरणी दाएश आणि अल-कायदाशी मिळतीजुळती आहे. त्यांना वाटते की त्यांच्या हिंसक कृत्यांना धार्मिक आधार आहे, जे पूर्णतः चुकीचे आहे.”

ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना बसला फटका

७ मे २०२५ रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व गोळीबाराच्या माध्यमातून प्रहार केला, मात्र भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत प्रभावी प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान