शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:51 IST

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. 9 जून रोजी झालेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू तर 40 जखमी झाले.

Rahul Gandhi on Terrorist Attack in Jammu : रविवारी(दि.9 जून) जम्मू काश्मीरच्या रियासी भागात माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दरशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. याशिवाय, कठुआ आणि डोडा भागातही हल्ले झाल्यामुळे राजकारण तापले आहे. याचे कारण म्हणजे, ज्या दिवसी हा हल्ला झाला, त्या दिवशी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता. आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

'पंतप्रधान जल्लोषात मग्न'राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर आपला संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी म्हटले की, "अभिनंदन संदेशांना उत्तर देण्यात मग्न असलेल्या नरेंद्र मोदींनाजम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंचाळ्या ऐकू येत नाहीत."

"गेल्या 3 दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडामध्ये 3 वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत, पण पंतप्रधान अजूनही आपल्या उत्सवात मग्न आहेत. हा देश उत्तर मागतोय...भाजप सरकारमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना का पकडले जात नाही?" असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला.

पंतप्रधानांच्या मौनावर काँग्रेसने उपस्थित केला प्रश्नदुसरीकडे, काँग्रेसनेही वाढत्या दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, "पाकिस्तानी नेत्यांच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे वेळ आहे, पण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करायला वेळ मिळाला नाही. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचली आहे, निरपराध लोक भ्याड दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत आहेत," अशी टीका काँग्रेसने केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला