शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

देशावर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 19:35 IST

देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह

ठळक मुद्देदेशाच्या सुरक्षेत गेल्या काही वर्षात मोठे बदल झाल्याचा दावापाकिस्तानला जागतिकस्तरावर उघडं पाडण्यात मोदी सरकार यशस्वीदहशतवाद्यांचा प्रत्येक डाव उलटवून लावण्याची भारतात ताकद

नवी दिल्लीराष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गोष्टींमध्ये आता खूप मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य आहे, असं ठाम मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. 

'हिंदूस्तान टाइम्स'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ यांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. ''मुंबईवरील हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. दहशतवादाने त्यावेळी भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं. मात्र, मला अभिमान आहे की आपल्या सुरक्षा दलाने एकाही दहशतवाद्याला जिवंत परत जाऊ दिलं नाही'', असं राजनाथ म्हणाले. 

"देशात गेल्या काही वर्षात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मोठे बदल झाले आहेत. त्यातून आम्ही देशातील नागरिकांना ठाम विश्वास नक्कीच देऊ शकतो की देशाची अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षा आता भक्कम झाली आहे. देशावर आणखी एक २६/११ सारखा दहशतवादी हल्ला होणं आता अशक्य आहे'', असं राजनाथ यांनी टिच्चून सांगितलं. 

केंद्राकडून लष्कराला पूर्णपणे सूट भारताच्या सीमेवर कोणत्याही हालचालीविरोधात संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातही भारताने याचंच पालन करत आव्हानला तोंड देत चीनी सैनिकांना मागे हटण्यासाठी भाग पाडलं, असं राजनाथ यांनी सांगितलं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerrorismदहशतवाद26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला