शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद मानवतेविरोधातच; आता वेळ आहे शांतता, बंधुभावाची - पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:44 IST

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : जगात कोठेही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि संघर्षामुळे कोणाचाही फायदा होत नाही, एक विभाजित जग म्हणून मोठ्या जागतिक आव्हानांचा आपण सामना करू शकत नाही, ही वेळ आहे शांतता आणि बंधुभावाची, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर येथे व्यक्त केले.

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

“जगाच्या विविध भागात काय घडत आहे याची सर्वांनाच जाणीव आहे. जग वाद आणि संघर्षांनी ग्रासले आहे, असे जग कोणाच्याही हिताचे नाही. विभाजित जग मानवतेसमोरील मोठ्या आव्हानांवर उपाययोजना करू शकत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.

‘ईव्हीएम’मुळे पारदर्शकता वाढली...भारतातील पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० कोटी मतदार मतदान करतील, त्यामुळे सर्व ‘पी२०’ प्रतिनिधींनी त्या काळात भारताला भेट द्यावी, असे आवाहन मोदींनी परिषदेत केले. भारताने आतापर्यंत १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत आणि २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका, जिथे त्यांचा पक्ष सलग दुसऱ्यांदा विजयी झाला, ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक होती, असे त्यांनी नमूद केले.

निवडणूक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापरामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली आणि कार्यक्षमता वाढली, मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांत निकाल जाहीर केले जातात, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTerrorismदहशतवाद