शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

दहशतवाद मानवतेविरोधातच; आता वेळ आहे शांतता, बंधुभावाची - पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:44 IST

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : जगात कोठेही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि संघर्षामुळे कोणाचाही फायदा होत नाही, एक विभाजित जग म्हणून मोठ्या जागतिक आव्हानांचा आपण सामना करू शकत नाही, ही वेळ आहे शांतता आणि बंधुभावाची, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर येथे व्यक्त केले.

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

“जगाच्या विविध भागात काय घडत आहे याची सर्वांनाच जाणीव आहे. जग वाद आणि संघर्षांनी ग्रासले आहे, असे जग कोणाच्याही हिताचे नाही. विभाजित जग मानवतेसमोरील मोठ्या आव्हानांवर उपाययोजना करू शकत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.

‘ईव्हीएम’मुळे पारदर्शकता वाढली...भारतातील पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० कोटी मतदार मतदान करतील, त्यामुळे सर्व ‘पी२०’ प्रतिनिधींनी त्या काळात भारताला भेट द्यावी, असे आवाहन मोदींनी परिषदेत केले. भारताने आतापर्यंत १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत आणि २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका, जिथे त्यांचा पक्ष सलग दुसऱ्यांदा विजयी झाला, ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक होती, असे त्यांनी नमूद केले.

निवडणूक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापरामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली आणि कार्यक्षमता वाढली, मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांत निकाल जाहीर केले जातात, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTerrorismदहशतवाद