शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दहशतवाद मानवतेविरोधातच; आता वेळ आहे शांतता, बंधुभावाची - पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:44 IST

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : जगात कोठेही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि संघर्षामुळे कोणाचाही फायदा होत नाही, एक विभाजित जग म्हणून मोठ्या जागतिक आव्हानांचा आपण सामना करू शकत नाही, ही वेळ आहे शांतता आणि बंधुभावाची, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर येथे व्यक्त केले.

येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०)  उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.

“जगाच्या विविध भागात काय घडत आहे याची सर्वांनाच जाणीव आहे. जग वाद आणि संघर्षांनी ग्रासले आहे, असे जग कोणाच्याही हिताचे नाही. विभाजित जग मानवतेसमोरील मोठ्या आव्हानांवर उपाययोजना करू शकत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.

‘ईव्हीएम’मुळे पारदर्शकता वाढली...भारतातील पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० कोटी मतदार मतदान करतील, त्यामुळे सर्व ‘पी२०’ प्रतिनिधींनी त्या काळात भारताला भेट द्यावी, असे आवाहन मोदींनी परिषदेत केले. भारताने आतापर्यंत १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत आणि २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका, जिथे त्यांचा पक्ष सलग दुसऱ्यांदा विजयी झाला, ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक होती, असे त्यांनी नमूद केले.

निवडणूक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापरामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली आणि कार्यक्षमता वाढली, मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांत निकाल जाहीर केले जातात, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTerrorismदहशतवाद