शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जम्मू-काश्मिरातील दहशतवाद आता मोजतोय अखेरची घटका: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 05:08 IST

तीन घराण्यांच्या वंशवादी राजकारणाने प्रदेशाला पोखरले

सुरेश डुग्गर

जम्मू : जम्मू-काश्मिरातील दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. या प्रदेशाला तीन घराण्यांनी उद्ध्वस्त केले, अशी टीका करताना, या सुंदर क्षेत्रास नष्ट करणाऱ्या वंशवादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने नवे नेतृत्व उभे केले आहे, असेही मोदी यांनी म्हटले.

जम्मूमधील दोडा जिल्ह्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी रॅलीला संबोधित  करताना म्हटले की, ‘तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जम्मू-काश्मीरला देशाचा एक सुरक्षित व समृद्ध भाग बनवूया.’ जम्मू-काश्मिरात १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील २४ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिलीच सभा येथे घेतली.

दगडफेक करणारे हात आता बदलासाठी झटताहेत

मोदी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरला विदेशी शक्तींनी लक्ष्य केले. त्याचवेळी वंशवादी राजकारणाने या सुंदर प्रदेशास आतून पोखरले.

राजकीय वंशवाद्यांनी आपल्या मुलांना पुढे केले आणि नवीन नेतृत्व उदयास येऊ दिले नाही. तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला उद्ध्वस्त केले. २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर येताच आम्ही तरुण नेतृत्व कसे उदयास येईल, याकडे लक्ष दिले.

मोदी यांनी म्हटले की, जम्मू-काश्मिरात आता दहशतवाद अंतिम घटका मोजत आहे. जे हात पोलिस व लष्करावर दगडफेक करीत होते, ते आता नवा जम्मू-काश्मीर उभारण्यासाठी झटत आहेत. मागील १० वर्षांत हा बदल झाला आहे.

५० वर्षांत प्रथमच पंतप्रधान डोडामध्ये

५० वर्षांत डोडाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्याआधी शुक्रवारी केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतला होता.

जितेंद्रसिंह यांनी सांगितले की, मागील ५० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने डोडाचा दौरा केला नाही. मोदींनी दूरवर्ती भागास प्राधान्य दिल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा