शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

करतारपूरमध्ये दहशतवादी कॅम्प?; गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यामुळे भारताची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:27 IST

ही माहिती देशातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून समोर आली.

चंडीगड - शिख समुदायाचं पवित्र स्थान असलेल्या करतारपूरसाठी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कॉरिडोर मार्ग खुला होण्यासाठी एक आठवडा बाकी आहे. याठिकाणी हजारो शिख बांधव पाकिस्तानच्या सीमेत असलेल्या करतारपूर येथे गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र याच करतारपूरमध्ये दहशतवाद्यांनी त्याचं बस्तान बांधल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या सीमेलगत असणाऱ्या पाकिस्तानी पंजाबमधील नारोवाल जिल्ह्यात दहशतवादी हालचाली होत असल्याची माहिती आहे. याच जिल्ह्यात करतारपूर गुरुद्वारा आहे. भारतीय शिख बांधवांसाठी करतारपूरला जाण्यासाठी भारत-पाकदरम्यान कॉरिडोर बनविण्यात आला आहे. याचं उद्धाटन येत्या आठवडाभरात होईल. मात्र यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांना ही महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे. 

हा कॉरिडोर भारताच्या पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यातील करतारपूर साहिब या गुरुद्वारेला जोडण्यात आलेला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे की, पाकिस्तानातील पंजाबमधील मुरिदके, शाकरगड आणि नारोवाल याठिकाणी दहशतवादी हालचाली वाढल्या आहेत. याठिकाणी दहशतवादी कॅम्प असण्याची शक्यता आहे त्याच महिला, पुरुष दहशतवादाचं ट्रेनिंग घेत आहे. 

ही माहिती देशातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून समोर आली. करतारपूर कॉरिडोरच्या माध्यमातून दहशतवादी भारताविरोधी कृत्यासाठी उपयोग करतील. तसेच ड्रग्स स्मगलर्स या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. अशी शक्यता या बैठकीत वर्तविण्यात आली आहे. पंजाब सीमेवर सुरक्षेसाठी तैनात करणाऱ्या एजन्सीने पंजाबमध्ये पाकिस्तानी सिमकार्डसचा वापर आणि नेटवर्क वापरण्यावर बंदी आणली आहे. तसेच भारताविरोधातील हालचालींवर सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत.   

टॅग्स :IndiaभारतterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान