शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवेळी भयंकर घटना; जन्मदात्या बापाने आवळला मुलाचा गळा, धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 10:22 IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा अखेरच्या सामन्यात पराभव झाल्याने संपूर्ण देश हळहळला. मात्र याच क्रिकेट सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना बघत असताना मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच त्याचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

रविवारी देशभरातील क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या विजयाची प्रार्थना करत टीव्हीसमोर बसले होते. कानपूर येथील गणेश प्रसाद हेदेखील क्रिकेटप्रेमी असल्याने टीव्हीसमोर बसून सामन्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांचा मुलगा दीपक याने अचानक टीव्ही बंद केला. वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगात आलेला असतानाच मुलाने टीव्ही बंद केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी चक्क वायरच्या साहाय्याने गळा आवळून दीपकचा खून केला. याप्रकरणी आरोपी गणेश प्रसाद याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

कानपुरातील चकेरी येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने फोनद्वारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासास सुरू केली. रविवारी रात्रीपासून दीपकचे वडील गणेश प्रसाद फरार असल्याचे पोलिसांना समजले. गणेश प्रसाद याला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे पिता-पुत्रामध्ये सतत वाद होत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे या वादातूनच गणेशने मुलाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. 

दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या गणेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. मात्र व्यसनाच्या वादातून नव्हे तर वर्ल्ड कप फायनल सुरू असताना टीव्ही बंद केल्याचा राग आल्यानेच मी मुलाचा खून केल्याची कबुली गणेश प्रसाद याने दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप