शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवेळी भयंकर घटना; जन्मदात्या बापाने आवळला मुलाचा गळा, धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 10:22 IST

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर धुळीस मिळालं. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा अखेरच्या सामन्यात पराभव झाल्याने संपूर्ण देश हळहळला. मात्र याच क्रिकेट सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना बघत असताना मुलाने टीव्ही बंद केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच त्याचा गळा आवळून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

रविवारी देशभरातील क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या विजयाची प्रार्थना करत टीव्हीसमोर बसले होते. कानपूर येथील गणेश प्रसाद हेदेखील क्रिकेटप्रेमी असल्याने टीव्हीसमोर बसून सामन्याचा आनंद घेत होते. मात्र त्यांचा मुलगा दीपक याने अचानक टीव्ही बंद केला. वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगात आलेला असतानाच मुलाने टीव्ही बंद केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी चक्क वायरच्या साहाय्याने गळा आवळून दीपकचा खून केला. याप्रकरणी आरोपी गणेश प्रसाद याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

कानपुरातील चकेरी येथे एका तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने फोनद्वारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासास सुरू केली. रविवारी रात्रीपासून दीपकचे वडील गणेश प्रसाद फरार असल्याचे पोलिसांना समजले. गणेश प्रसाद याला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे पिता-पुत्रामध्ये सतत वाद होत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे या वादातूनच गणेशने मुलाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. 

दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या गणेशचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. मात्र व्यसनाच्या वादातून नव्हे तर वर्ल्ड कप फायनल सुरू असताना टीव्ही बंद केल्याचा राग आल्यानेच मी मुलाचा खून केल्याची कबुली गणेश प्रसाद याने दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कप