शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

सीमेवर तणाव ! पाकिस्तानला अद्दल घडवा, बीएसएफ प्रमुखांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 18:41 IST

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानकडून आतापर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत  होतं. परंतु आता आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवरही शस्त्रसंधीचा भंग केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय लष्करानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी त्यांचा प्रतिकार करा आणि त्यांना अद्दल घडवा, असं सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आदेश दिले आहे. ते म्हणाले, सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून ब-याचदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल ए. सुरेशलाही हकनाक शहीद व्हावं लागलं आहे. सुरेशचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. सुरेशचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. बीएसएफचा कॉन्स्टेबल बंकरमध्ये असताना एक गोळी लागून तो शहीद झाला. यासारख्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही याला occupational hazards समजू शकता. आम्ही आमच्या लष्कराला बुलेटप्रूफ हेल्मेट आणि जॅकेट दिले आहेत. परंतु सर्वांगाचं रक्षण करण्यासाठी जॅकेट अपुरे पडत आहेत, असंही के. के. शर्मा म्हणाले आहेत. 

सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय लष्करानं अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे. भारताच्या या धडक कारवाईचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आता डीजीएमओ स्तराच्या बैठकीवर विचारविनिमय सुरू आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारताला डीजीएमओ स्तराच्या बैठकीचे निमंत्रण देण्यावर पाकिस्तानात विचार सुरू आहे. 

पाकिस्तानी सिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार डीजीएमओ स्तराची बैठक घेण्यावर पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत तरी डीजीएमओ स्तराच्या बैठकीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल असे इंडियन एक्सप्रेस दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान