शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढण्याचा मोह बेतला जीवावर; ट्रेनने धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 08:48 IST

रेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे.

ठळक मुद्देरेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावरून हा तरूण जात होता. कानात मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने गाडीचा हॉर्न त्या तरूणाला ऐकु आला नाही.

नवी दिल्ली- रेल्वे रूळावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फीचा नाद अनेकांना भोवल्याची बरीच उदाहरणं आपण रोज पाहतो आहे. असाच एक प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. रेल्वे रूळावरून जाताना इअरफोन्स लावून गाणी ऐकत तसंच मध्येच सेल्फी काढण्याच्या नादाने एका तरूणाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावरून हा तरूण जात होता. कानात मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने गाडीचा हॉर्न त्या तरूणाला ऐकु आला नाही त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने या मुलाचा मृत्यू झाला. 

अरबाज (वय 18) असं या तरूणाचं नाव असून तो तेथिल सरकारी शाळेत शिकत होता. क्लासला जाण्यासाठी तो घरातून निघाल्यावर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी वेलकम रेल्वे स्टेशनच्या रूळावर अरबाजचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या बाजूला पोलिसांना इअरफोन्स सापडले आहेत. अपघातानंतर अरबाजचा मोबाइल फोन चोरी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रेल्वे रूळावरून चालत जात असताना अरबाज मध्येच थांबून सेल्फी काढत होता, अशी माहिती जीआरपीने दिली आहे. रेल्वे रूळावरून जात असताना अरबाज मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेनचा आवाज त्याला ऐकु आला नसावा, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास अजून सुरू आहे. तसंच सेल्फी काढण्याच्या मोहातच अरबाजचा जीव गेला आहे का? याबद्दल माहिती देणारा अजून कुठलाही साक्षीदार पोलिसांना मिळाला नाही. या घटनेमागे हत्येची शक्यताही नाकारता येत नाही, असं पोलिसांचं मत आहे. 

अपघातानंतर एक तास अरबाजचा मृतदेह रेल्वे रूळावरच पडून होता. वेलकम स्टेशनवरू जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांना मृतदेह दिसल्यावर त्यांनी नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला. अपघात स्थळापासून अरबाज फक्त एक किलोमीटर अंतरावर राहत होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणी अरबाजच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत. क्लासला जाताना अरबाज त्याच्या काही मित्रांना भेटायचा त्याच मित्रांची चौकशी सुरू आहे. दररोज क्लासला जाताना अपघात झालेल्या मार्गावरूनच तो जायचा का ? या अनुषंगाने मित्रांची चौकशी केली जातीये.