शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

पर्वणीच्या फेरनियोजनात तात्पुरता दिलासा (सीडीसाठी)

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार्‍या दुसर्‍या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी पर्वणीचे फेरनियोजन करण्याचे ठरविणार्‍या प्रशासनाने फक्त नाशिकरोडला येणार्‍या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविले. त्यामुळे दुसर्‍या पर्वणीला तरी पोलीस बॅरिकेडिंगचे भय कमी होईल अशी आशा बाळगून असलेल्या शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार्‍या दुसर्‍या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी पर्वणीचे फेरनियोजन करण्याचे ठरविणार्‍या प्रशासनाने फक्त नाशिकरोडला येणार्‍या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविले. त्यामुळे दुसर्‍या पर्वणीला तरी पोलीस बॅरिकेडिंगचे भय कमी होईल अशी आशा बाळगून असलेल्या शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभीच पहिल्या पर्वणीला भाविकांची गर्दी होती, परंतु दुसर्‍या पर्वणीला चारपट भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केली व पहिल्या पर्वणीच्या नियोजनात राहून गेलेल्या उणिवा दूर करण्यासाठी तसेच नागरिकांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी बैठक बोलविण्यात आल्याचे जाहीर केले. लोकप्रतिनिधींच्या सूचना व पहिल्या पर्वणीच्या काळात ज्या काही बाबी लक्षात आल्या त्यावरून प्रशासनाने काही बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यात नाशिकरोडच्या भाविकांची झालेली पायपीट कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले नियोजन त्यांनी सांगितले त्याचबरोबर शहरातील दुचाकी वाहनांसाठी इदगाह मैदान, डोंगरे वसतिगृह आदि ठिकाणी पार्क करता येतील काय या दृष्टीने चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले. शहरात कमीत कमी बॅरिकेडिंग करण्यावर भर असेल; परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यात तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
१२ व १३ सप्टेंबर रोजी अमावास्या असल्याने दोन दिवस भाविकांची स्नानासाठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी, १२ रोजी पोळा सण व सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील भाविक येण्याची शक्यता कमी आहे; परंतु परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्यामुळे पहिल्या पर्वणीला असलेले बा‘ वाहनतळ मात्र कायम राहतील व त्याच ठिकाणी खासगी वाहने उभी करावी लागतील असेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारच्या सूचना तसेच काही तक्रारीही केल्या त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण जगाचे या सोहळ्याकडे लक्ष लागून असल्यामुळे त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा विचार करता येत्या एक -दोन दिवसांत त्यापैकी काय काय करता येईल याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिवा पांडू गावित, बाळासाहेब सानप, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष अनघा फडके, शिवाजी चुंभळे, विजय करंजकर, राजू देसले, कविता कर्डक यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, महेश पाटील, उदय किसवे यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.