शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

तेलुगू देसम मोदी सरकारवर नाराज, दोन मंत्री राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 23:16 IST

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार आहेत.

अमरावती - आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (7 मार्च)रात्री उशीरा ही घोषणा केलीय. तेलगू देसम पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री आहेत. नायडूंच्या या घोषणेनंतर हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी गुरुवारी राजीनामा देतील.

चंद्राबाबू यांनी असे ट्विट केले आहे की, केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मला माहीत नाही आम्ही काय चूक केली, पण ते लोक निरर्थक बोलतायत. मी आमचा निर्णय मोदींना सांगण्यासाठी गेलो होते. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही गेली चार वर्षं संयम बाळगला. मी अनेकदा सर्व प्रकारे केंद्र सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प मांडल्यापासून आम्ही केंद्राकडे आंध्राला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. पण केंद्रानं आमची दखल घेतली नाही. त्यामुळे एनडीए आणि केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत आणि तो आमचा अधिकार आहे. तेलुगू देसम पक्षाचे केंद्रातील मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी हे गुरुवारी राजीनामा देणार आहे, असेही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. 

शिवाय, आंध्र प्रदेश पुनर्रचनेच्या 2014 च्या कायद्यात तसंच संसदेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणे हा राज्याच्या जनतेच्या भावनांचा अपमान असल्याची टीकादेखील नायडू यांनी केंद्र सरकारवर केली होती. 

केंद्र सरकारने आंध्र राज्याला विशेष दर्जा दिला नसल्यानंच तेलुगू देसम पक्ष रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाहेर पडण्याची धमकी दिल्यानंतर सत्तारूढ भाजपाने आंध्रच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवले होते. यापूर्वी रालोआची सत्ता असलेल्या राज्यांच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जात होते. पण त्यावेळी ते अन्य कामात गुंतलेले असल्याने आंध्रच्या भावनांना आवर घालण्यासाठी स्वत: व्यंकय्या नायडू परिषदेत उपस्थित राहिले. यावेळी व्यंकय्या नायडूंनी चंद्राबाबूंशी चर्चा केली आणि चर्चेचा वृत्तांत पंतप्रधानांना कळवला. त्यानंतर चंद्राबाबू नायडूंची समजूत घालण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांना पाठवले होते.

राम माधवही आंध्रचेच आहेत पण नायडू यांनी त्यांना दाद दिली नाही. आपला संयम आता संपला आहे. आपण त्यासाठी चार वर्षे वाट बघितली पण केंद्राने आंध्रला आर्थिक मदत केली नाही. आता आपण लोकांना तोंड दाखवू शकत नाही. भाजपा आपल्याला बाजूला सारून आय.एस.आर. काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची तयारी करीत असावी असा चंद्राबाबूंना संशय होताच. अखेर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले आहेत. 

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू