शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

तेलंगणात १६ व्या दिवशी सापडला पहिला मृतदेह; दहा फूट गाळाच्या खाली मशिनमध्ये दिसत होता हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:35 IST

तेलंगणात कोसळलेल्या बोगत्यातून १६ व्या दिवशी पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Telangana Tunnel Collapse:तेलंगणामध्ये बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ कामगांपैकी एकाचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. तेलंगणा येथे श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक कोसळला होता. अपघाताच्या वेळी कामगार बोगद्याच्या आत होते. बोगदाच्या काही भाग कोसळत असताना कामगार बाहेर पळत आले. मात्र त्यातले आठ जण आतच अडकले. या आठ कामगारांच्या शोधासाठी दोन आठवड्यांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ जणांचा जीव वाचण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

तेलंगणा बोगदा दुर्घटनेच्या १६व्या दिवशी बचाव पथकाला पहिला मृतदेह सापडला. बोगद्यात शोध घेत असताना गाळाच्या खाली १० फूट खाली मशीनमध्ये गुरप्रीत सिंग नावाच्या कामगाराचा मृतदेह अडकलेला आढळून आला. त्याचा फक्त हात दिसत होता. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नागरकुर्नूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. इतर ७ मजुरांचा शोध सुरू आहे ज्यासाठी रोबोट आणि स्निफर डॉगची मदत घेतली जात आहे.

गुरप्रीत सिंग याचा मृतदेह कोसळलेल्या एसएलबीसी बोगद्यातून बाहेर काढण्यात आला होता. त्याचा मृतदेह पंजाबमधील मूळ गावी पाठवण्यात आला आहे. उर्वरित सात जणांना शोधण्यासाठी सोमवारीही बचावकार्य सुरूच आहे. रॉबिन्स कंपनीत टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ऑपरेटर म्हणून काम करणारा गुरप्रीत सिंग हा त्या आठ जणांमध्ये होता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरप्रीतच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ४८ तासांहून अधिक काळ खोदकाम करुन गुरप्रीतचा मृतदेह बाहेर काढता आला. १० फूट खोल गाळाखाली तो मशीनसह गाडला गेला होता.

डाव्या कानातले आणि उजव्या हातावरच्या टॅटूवरुन सिंगची ओळख पटली. गुरप्रीत सिंग व्यतिरिक्त, अडकलेल्या इतर सात जणांमध्ये श्री निवास, मनोज कुमार (उत्तर प्रदेश), सनी सिंग (जम्मू आणि काश्मीर), संतोष साहू संदीप साहू, जगता खेस आणि अनुज साहू यांचा समावेश आहे, हे सर्व झारखंडचे आहेत.

दरम्यान, २०२० मध्ये एमबर्ग टेक एजी नावाच्या कंपनीने बोगद्याचे सर्वेक्षण केले होते. बोगद्यातील काही फॉल्ट झोन आणि कमकुवत खडकांच्या धोक्याबद्दल कंपनीने इशारा दिला होता. सर्वेक्षणाचा अहवालही बोगदा बांधणाऱ्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता. १४ किमी लांबीच्या बोगद्यातील १३.८८ किमी ते १३.९१ किमी भागातील खडक कमकुवत असल्याचे अहवालात सांगितले होते. हा भागही पाण्याने भरला आहे. अहवालात ज्या भागाचे धोकादायक वर्णन करण्यात आले होते, तोच भाग पडला असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. मात्र, राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने त्यांना अशा कोणत्याही अहवालाची माहिती नव्हती असं म्हटलं.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अपघातानंतर बोगद्यात काम करणाऱ्या काही कामगारांनी भीतीपोटी काम सोडले आहे. या प्रकल्पात ८०० लोक काम करत आहेत. त्यापैकी ३०० स्थानिक तर उर्वरित झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघात