शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात आता प्रचारफैरींचा झंझावात; भर स्टार प्रचारकांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:46 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल

- धनाजी कांबळे

हैैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल. राज्यात सर्वात शेवटी म्हणजे ७ डिसेंबरला मतदान होणार असले तरी वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. राज्यात टीआरएस, भाजपा आणि काँग्रेस-तेलगू देसम-सीपीआय-तेलंगणा जन समिती आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.आरोप-प्रत्यारोपांचा प्रचारफैरी झडू लागल्याने सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाक्षाध्यक्ष अमित शहा यांचे प्रचारदौरे होणार आहे. याशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री व टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही प्रचारसभा गाजवतील.स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेल्या तेलंगणात प्रथमच सोनिया गांधी सभा घेणार आहेत. त्या २३ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये जाहीर सभा घेतील, तर २८, २९, ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या राज्यात प्रचारसभा होतील. तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा २५ नोव्हेंबरपासून तीन दिवस प्रचारसभा घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, पुतणे टी. हरीश राव यांनी याधीच प्रचार सुरू केला असला तरी, त्यांच्याही प्रचारांचा झंझावात यापुढे पाहायला मिळणार आहे. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि एन. टी. रामाराव यांचे पुत्र एन. बालकृष्ण हे प्रचारदौऱ्यात मुख्य आकर्षण राहणार आहेत. काँग्रेस आघाडीत सहभागी असलेले तेलंगणा जन समितीचे नेते एम. कोडनदरम यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शेतकरी प्रश्न, शिक्षण, रोजगार, आरक्षणयासह विविध मुद्द्यांवर विरोधक टीआरएसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.निवडणुकीत तीन महत्त्वाच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी, एमआयएमचे नेते अकबरूद्दिन ओवेसी आणि भाजपचे नेते जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे. नलगोंडी येथील हुजूरनगर मतदारसंघातून उत्तमकुमार रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे.टीआरएस सरकार अपयशी ठरले असून, काँग्रेस, टीडीपी, सीपीआय आघाडीला तेलंगणातील जनता साथ देईल, असे त्यांनी म्हटले आहे. अकबरूद्दिन ओवेसी हे असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू असून, त्यांनी हैैदराबाद विभागात चंद्रयंगुट्टा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे, तर भाजपाच्या किसन रेड्डी यांनी अंबरपेठ येथून अर्ज भरला आहे.भाजपावर तेलगू देसमचे टीकास्त्रभारतीय जनता पार्टीचे नेते देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. भाजपाने गेल्या चार-साडेचार वर्षांत विरोधी पक्षांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचाच प्रयत्न केला, अशी टीका आंध्र प्रदेश राज्याचे अर्थमंत्री आणि तेलगू देसमचे नेते रामकृष्णाडू यांनी केली आहे. भाजपाचा कारभार तुघलकी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरांची नावे बदलून क्रांती होणार नसून, सर्वसामान्य माणसांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी टीडीपीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018