शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:36 IST

देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.

ठळक मुद्देदेशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नवी दिल्ली - देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  मतदारसंघात ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेतल्यास प्रत्येक बुथवर तीन-तीन मशीन्स ठेवाव्या लागतील. त्यामुळे अडचणी निर्माण होतील म्हणूनच निवडणूक आयोगाने या मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिकेच्या एकाच कागदावर सर्व उमेदवारींची नावं आणि निवडणूक चिन्ह छापणं सोपं आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने अशाप्रकारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ईव्हीएम मशीनमध्ये या गोष्टी शक्य नाही. त्यासाठी तीन-तीन ईव्हीएम मशीन ठेवाव्या लागतील. त्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच संबंधित मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग