शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:36 IST

देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.

ठळक मुद्देदेशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नवी दिल्ली - देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  मतदारसंघात ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेतल्यास प्रत्येक बुथवर तीन-तीन मशीन्स ठेवाव्या लागतील. त्यामुळे अडचणी निर्माण होतील म्हणूनच निवडणूक आयोगाने या मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिकेच्या एकाच कागदावर सर्व उमेदवारींची नावं आणि निवडणूक चिन्ह छापणं सोपं आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने अशाप्रकारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ईव्हीएम मशीनमध्ये या गोष्टी शक्य नाही. त्यासाठी तीन-तीन ईव्हीएम मशीन ठेवाव्या लागतील. त्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच संबंधित मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार  या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग