शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

"गरज पडल्यास लष्कराच्या छावणीचं वीज-पाणी कापू"; तेलंगणाच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 17:06 IST

KTR Rao : केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचे (Telangana) आयटी मंत्री आणि टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर राव (KTR Rao) यांनी विधानसभेत एक वादग्रस्त विधान केलं आहे. हैदराबादच्या नाला विकास प्रकल्पावर उत्तर देताना केटीआर राव यांनी हे विधान केलं आहे. लष्करी छावणीच्या (Cantt Area) अंतर्गत आम्ही गरज पडेल तेव्हा वीज आणि पाणी कापू. लष्कराकडून मनाला वाटेल तेव्हा रस्ता बंद केला जातो. हे योग्य नाही. त्यामुळे आम्हीही त्यांचं वीज, पाणी कापू शकतो, असं केटीआर राव यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपाने यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. त्यांच्या मनात लष्कराविषयीचा सन्मान नाही हेच दिसून येतं, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते एनव्ही सुभाष यांनी केली आहे. लष्कराबाबतची सरकारची काय मते आहेत, हेच या विधानातून दिसून येत असल्याचंही सुभाष यांनी सांगितलं.

सरकारचं कोणी ऐकत नाही तेव्हा ते धमकी द्यायला सुरुवात करतात. लोकांचं काम न करणाऱ्या या सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. तेलंगणा सरकारमध्ये काही समस्या असतील तर त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. तसेच समस्येतून मार्ग काढला पाहिजे, असं भाजपा प्रवक्ते सुभाष यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची प्रकृती बरी नाही. त्यांनी काल वैद्यकीय चाचणी करून घेतली. चंद्रशेखर राव यांची प्रकृती चांगली असून घाबरण्याचं काही कारण नाही, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान तपासणी केल्यानंतर चंद्रशेखर राव हे घरी निघून गेले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारणBJPभाजपा